शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

भारताला विकसित देश बनविण्यासाठी ‘सीएं’ची भूमिका महत्त्वाची: भागवत कराड

By प्रशांत तेलवाडकर | Updated: October 7, 2022 14:40 IST

'द्रारिद्र्य निर्मूलन होत नाही, तोपर्यंत देशाचा विकास होत नाही. त्यासाठी गरीबांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. यासाठी ‘सीएं’नी आपले योगदान द्यावे.''

औरंगाबाद: ज्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे तोच देश विकास करू शकतो. आपल्यावर १५९ वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटनला मागे टाकून आपली अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर जाऊन पोहोचली आहे. भारताला विकसित देश बनविण्यासाठी चार्टर्ड अकाैंटंटची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ‘सीएं’ना मोठी मागणी असून, त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी व्यक्त केले.

‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाैंटंट्स ऑफ इंडिया’ने गुरुवारी (दि. ६) आयोजित दीक्षांत सोहळ्यात ते मार्गदर्शन करत होते. सातारा परिसरातील ‘आईसीएआय’ भवनात पश्चिम विभागातील १५० नवीन पात्र चार्टर्ड अकाैंटंट्सला या सोहळ्यात पदवी प्रदान करण्यात आली. महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. के. व्ही. एस. सरमा यांची विशेष उपस्थिती होती.

डाॅ. कराड यांनी सांगितले की, द्रारिद्र्य निर्मूलन होत नाही, तोपर्यंत देशाचा विकास होत नाही. त्यासाठी गरीबांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. यासाठी ‘सीएं’नी आपले योगदान द्यावे.भारतातील न्यायिक प्रणालीमध्ये सहभागी होण्यासाठी व अनेक आर्थिक केसेसचा उलगडा करण्यासाठी ‘सीएं’नी कायद्याच्या पदवीसाठी प्रवेश घ्यावा़, असे आवाहन राष्ट्रीय विधी विद्यापीठ कुलगुरू डॉ. सरमा यांनी केले.

तत्पूर्वी सीए संघटनेचे अध्यक्ष देबशीस मित्रा व उपाध्यक्ष अनिकेत तलाठी यांनी दिल्लीहून ऑनलाईन मार्गदर्शन केले. केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य सीए उमेश शर्मा यांनी चार्टर्ड अकौंटंटच्या प्रत्येक स्पेलिंगचा अर्थ समजावून सांगितला व नव्याने पात्र ठरलेल्या ‘सीएं’ना शपथ दिली. प्रारंभी, सीए स्थानिक शाखेचे अध्यक्ष योगेश अग्रवाल, उपाध्यक्ष गणेश भालेराव, सचिव केदार पांडे, कोषाध्यक्ष अमोल गोधा, विकासा चेअरमन महेश इंदाणी, शाखा समितीच्या सदस्या रूपाली बोथरा यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

पूर्वी कुरिअरद्वारे मिळत असे पदवीसीए उमेश शर्मा यांनी सांगितले की, पूर्वी कुरिअरने पदवी मिळत असे. औरंगाबादेत दीक्षांत सोहळा आयोजित करावा, अशी सर्वांची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBhagwat Karadडॉ. भागवत