शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

तलाठी परीक्षेसाठीचे १० लाख रु. पाण्यात

By admin | Published: September 15, 2015 12:12 AM

औरंगाबाद : जिल्हा निवड समितीने रविवारी रिक्त असलेल्या १० तलाठी पदांसाठी घेतलेली लेखी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून,

औरंगाबाद : जिल्हा निवड समितीने रविवारी रिक्त असलेल्या १० तलाठी पदांसाठी घेतलेली लेखी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून, १५ सप्टेंबर रोजी परीक्षेची तारीख जाहीर होणार आहे. असे असले तरी रविवारच्या परीक्षेचा अंदाजे १० लाख रुपयांचा खर्च पाण्यात गेला असून, नवीन परीक्षेसाठीदेखील तेवढाच खर्च होणार आहे. कालच्या परीक्षेचा खर्च प्रश्न आणि उत्तरपत्रिकांमध्ये घोळ करणाऱ्या संस्थेकडून वसूल केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरातील १५ परीक्षा केंद्रांवर तलाठी पदासाठी लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सुमारे ३ हजार ५०० उमेदवार उपस्थित होते. उमेदवारांना परीक्षेदरम्यान १०० प्रश्नांची प्रश्नपत्रिका आणि ८० पर्यायांची उत्तरपत्रिका देण्यात आली.सामान्य ज्ञानाचे प्रश्न सोडून उर्वरित ८० प्रश्न सोडवावेत, असे जिल्हा निवड समितीने ऐन वेळी आदेश काढले. त्यामुळे परीक्षार्थींचा पुरता गोंधळ उडाला. सामान्य ज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण होताच जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे व निवड समिती सदस्यांनी रविवारी झालेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.११५ परीक्षा केंद्रे होती. ५ रुपये प्रति उमेदवार आसनव्यवस्थेचा खर्च केंद्रांना देण्यात येतो. त्यासाठी अंदाजे २५ हजार १६० रुपयांचा खर्च झाला. केंद्रावर ४१४ समवेक्षक, लिपिक, शिपाई कार्यरत होते. २ लाखांच्या आसपास त्यांचे मानधन असू शकते. २स्टेशनरी व इतर साहित्यासाठी ५० हजारांपर्यंत खर्च झाला असेल. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका छपाईसाठी ५ लाखांचा खर्च झाला असेल. ८ ते १० लाख रुपयांच्या दरम्यान त्या परीक्षेचा खर्च झाला असावा. तेवढाच खर्च आता पुन्हा नव्याने करण्यात येणार आहे.