शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

भाजप सरकार संविधान बदलणार ही अफवाच; रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 4:51 PM

बाबासाहेबांच्या विचारांना न्याय देण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनला संविधान हे नाव दिले आहे. तरीही विरोधक हे मोदी संविधान बदलतील, अशी अफवा पसरवून समाजामध्ये गैरसमज पसरवत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.

विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिनानिमित्त सभेत केंद्रीय राज्यमंत्री आठवले बोलत होते. सुरुवातीला रिपाइंच्या शहर व जिल्हा शाखेच्या वतीने गुलाबाच्या भल्या मोठ्या हाराने आठवले व व्यासपीठावर उपस्थित प्रदेश कार्यकारिणीचे स्वागत संजय ठोकळ, नागराज गायकवाड, विजय मगरे यांनी केले.

नेहमीच्या शैलीत आठवले यांनी ‘मी नाही कोणाचा गुलाम’ या कवितेने भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, बाबासाहेबांच्या विचारांना न्याय देण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत. मुंबईत इंदू मिलच्या जागेवर ते 'स्टॅचू ऑफ लिबर्टी'पेक्षाही उंच साडेचारशे फुटांचा पुतळा उभारणार आहेत. बाबासाहेबांच्या विचारांची उंची आकाशाला गवसणी घालणारा आहे. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व जाती-धर्माला जोडले आहे. जात, धर्मापेक्षाही आपला देश महत्त्वाचा आहे, हा विचार बाबासाहेबांचा आहे. तरुणांनी आता लष्करात जावे. मी तुमच्या सोबत आहे. लष्करात माणसे मरतात, असे नाही. इकडेही अपघातात रोज माणसे मरतातच की, असेही आठवले म्हणाले.कार्यक्रमाचे जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ यांनी प्रास्ताविक केले. शहराध्यक्ष नागराज गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, दौलत खरात, पप्पू कागदे यांनी मनोगत व्यक्त केले.

महायुतीच्या नेत्यांची सभेकडे पाठडॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सभेकडे महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, स्थानिक नेते, आमदारांपैकी कोणीही फिरकले नाही. व्यासपीठावरील फलकावर त्यांचे फोटो पाहून नागरिकांमध्ये यासंबंधीची कुजबुज ऐकायला मिळाली.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेNarendra Modiनरेंद्र मोदीAurangabadऔरंगाबाद