शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

सरपंच हत्येप्रकरणी राजकीय भूमिकेपेक्षा संवेदनशीलता महत्वाची; पंकजा मुंडेंचा धसांवर निशाणा

By बापू सोळुंके | Updated: January 11, 2025 19:11 IST

कोणत्याही घटनेचे राजकारण करणाऱ्यांसाठी अशा घटना एक मंचच असतो: पंकजा मुंडे

छत्रपती संभाजीनगर: संतोष देशमुख खून प्रकरण राजकीय भूमिका घेण्यापेक्षा संवेदनशील पध्दतीने हाताळले असते तर बरं झाले असते. या घटनेची ज्या पद्धतीने मांडणी केली, त्यामुळे बीड जिल्हा बदनाम झाला. बीडचे लोक स्वाभिमानी आहेत, उसतोड करुन पोट भरतात, कोणत्याही घटनेचे राजकारण करणाऱ्यांसाठी अशा घटना एक मंचच असतो, अशा शब्दात राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर टीका केली.

मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी पर्यावरण आणि पशुसंवर्धन विभागाची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंंत्री मुंडे म्हणाल्या की, पशुसवंर्धन आणि पर्यावरण विभागात खूप आव्हानात्मक काम आहे. संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली, यावर आपली प्रतिक्रिया काय असे विचारले असता, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री आहेत. त्यांनी कारवाई केली असेल तर माझी काय प्रतिक्रिया असेल, असा प्रतिसवाल त्यांनी केला. या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची मागणी आपण सर्वप्रथम केली होती. 

संतोष देशमुख खून प्रकरणावरून बीड जिल्ह्याला बदनाम केले जात आहे का, असे  विचारले असता ते म्हणाले की, कोणतीही घटना होऊ दे, अशा घटनांमध्ये ज्यांना राजकारण करायचे त्यांच्यासाठी हा एक मंचच आहे. धनंजय मुंडे यांच्याबाबतीत अजित दादा यांनी प्रतिक्रिया दिली असेल तर या विषयावर मी प्रतिक्रीया नोंदवणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रदूषण विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणारप्रदूषण हा ग्लोबल विषय आहे. प्रदूषणाचा विषयावर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणार असल्याचे मंत्री पंकजा यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, काही ठिकाणी हवेचे तर काही ठिकाणी पाणी प्रदूषणाचा जास्त आहे. प्रदूषण करणाऱ्या लोकांना नोटीसा देण्यात येइल. ज्यांनी कामात कचुराई केली, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. नदी पुनरूज्जीवनाचे काम करण्यात येणार आहे.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSuresh Dhasसुरेश धसPankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीड