शहरं
Join us  
Trending Stories
1
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
2
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
3
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
4
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
5
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
6
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
7
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
8
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
9
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
10
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
11
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
12
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
13
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
14
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
15
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
16
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
17
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
18
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
19
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
20
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा

औरंगाबादमध्ये आहे सातवाहनकालीन जाते; एकाच वेळी दोन महिला दळत होत्या दळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 7:29 PM

सर्वांनी उभ्या दांड्याचे जाते पाहिले आहे; पण शहरात आडव्या दांडीचे दुर्मिळ जाते जतन करून ठेवण्यात आले आहे, तेही सातवाहनकालीन, म्हणजे सुमारे २ हजार वर्षांपूर्वीचे.

ठळक मुद्देशहरात आडव्या दांडीचे दुर्मिळ जाते जतन करून ठेवण्यात आले आहेया जात्याला आडवी दांडी, एकाच वेळी दोन महिला दळत होत्या दळण

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : पूर्वी घरोघरी महिला जात्यावरच दळण दळत असत; मात्र काळाच्या ओघात जाते मागे पडले. आता फक्त लग्नाच्या विधीपुरतेच जात्याचे महत्त्व मर्यादित राहिले आहे. सर्वांनी उभ्या दांड्याचे जाते पाहिले आहे; पण शहरात आडव्या दांडीचे दुर्मिळ जाते जतन करून ठेवण्यात आले आहे, तेही सातवाहनकालीन, म्हणजे सुमारे २ हजार वर्षांपूर्वीचे. ते दगडी जाते एवढे जड आहे की फिरवण्यासाठी दोन महिला लागत.   

‘कोंबड्याची बांग.. आली कानावर बाई... ये गं दळण दळाया, सई बाई गं बाई....सासराच्या जात्यात... जीव अडकतो लई, गरागरा फिरताना.. हात थांबतच न्हाई’, अशा ओव्या म्हणत सासुरवाशिणी पहाटे पायलीपायलीने दळण दळत असत. भक्तीची आस आणि प्रापंचिक दु:खाची न संपणारी वीण यांचे दर्शन पहाटेच्या जात्यावरच्या ओव्यांमधून होत असे. या जात्यांची व ओव्यांची आठवण शहरातील पुराणवस्तू संग्राहक रमेश रुणवाल यांनी त्यांच्याकडील सातवाहनकालीन जाते दाखविल्याने झाली. टिळकपथ रोडवरील आपल्या दुकानातील माळवदावर त्यांनी हा दुर्मिळ, ऐतिहासिक ठेवा जतन करून ठेवला आहे. जाते तर सर्वांना माहीत आहे. मग, या जात्याचे वैशिष्ट्य काय... असे आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल.

आजही अनेकांच्या घरात दगडी जाते आहे; पण त्यास फिरविण्यासाठी एकच दांडा असतो; मात्र रुणवाल यांच्याकडील जात्याला उभा नव्हे आडवा दांडा आहे. एक नव्हे, तर दोन महिला समोरासमोर बसून या जात्यावर दळण दळत असत. इतिहास संशोधकांच्या मते सातवाहन काळात या जात्याची निर्मिती झाली असावी. तेव्हा जात्याला आडवी दांडी असे. रमेश रुणवाल यांनी सांगितले की, पुराणवस्तूच्या शोधासाठी ते देशभर फिरत असतात.

३६ वर्षांपूर्वी नेवासा येथील त्यांचे मित्र मोहिते यांच्या घरी त्यांना हे आडव्या दांडीचे जाते दिसले. मोहित्यांनी ते जाते रुणवाल यांना दिले. हे जाते सातवाहनकालीन असल्याचा निर्वाळा तेव्हाच इतिहास संशोधक ब्रह्मानंद देशपांडे यांनी दिला होता. रुणवाल यांनी हे जाते नंतर आपल्या पोटच्या मुलासारखे सांभाळले आहे; मात्र आता  जात्याच्या दगडाची झीज झाली आहे. खालच्या पाळूला तडेही गेले आहेत. आता हे जाते जतन करणे अवघड होत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तुसंग्रहालय किंवा सोनेरी महल येथील पुरातनवस्तुसंग्रहालयात हे प्राचीन जाते देण्याचा त्यांचा विचार आहे.

अशी जाती दुर्मिळच इतिहास संशोधक डॉ.रा.श्री. मोरवंचीकर हे जात्याचे वैशिष्ट्य सांगताना म्हणाले की, ‘सातवाहनकालीन महाराष्ट्र’ या पुस्तकात मी  सातवाहनकालीन जात्याचा उल्लेख केला आहे. सिंधू संस्कृतीत पाट्यांचा वापर केला जात असे. पाट्यांप्रमाणे सातवाहन घरांत जाती सापडली आहेत. धान्य दळण्यासाठी जात्याचा उपयोग प्रथम याच काळात केला गेला. या जात्याची खालची तळी पातळ व बर्हिगोल असून, वरची तळी उभट गोल आकारात असत. वरच्या तळीस उंचावलेले तोंड असून, या तोंडाच्या गळ्यातून आडवा लाकडी दांडा घालण्याकरिता आरपार छिद्र आहे. वरची तळी खालच्या तळीमध्ये अडकवलेल्या उभ्या लोखंडी खिळ्याभोवती बसविली जाते. दोन महिला परस्परांसमोर बसून आडव्या दांड्याच्या  मदतीने जाते गोलाकार फिरवीत. आजच्या जात्याच्या सुटसुटीतपणापुढे हे जाते थोडेसे अवघड वाटते.

उत्खननात सापडतात...आडवी दांडी असलेले हे जाते सातवाहनकालीन आहे. कोल्हापूर, शिरपूर, नेवासा, भोकरदन या पट्ट्यात उत्खन्नात अशी जाती सापडली आहेत. ५० वर्षांपूर्वी नेवासा भागात डेक्कन कॉलेजने डॉ. साकलिया यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन केले होते. त्यात आडव्या दांडीचे तीन जाते सापडले होते. काही संग्राहालयांत अशी जाती आपणास बघण्यास मिळतील. - साईली पलांडे-दातार, पुरातत्व अभ्यासक 

टॅग्स :cultureसांस्कृतिकArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण