शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

साठे चौक बंद, मात्र वाहतूक समस्या कायम

By admin | Published: November 25, 2015 10:56 PM

शिरीष शिंदे , बीड मोठ्या अपघातास कारणीभूत ठरणारा अण्णा भाऊ साठे चौक अधीक्षकांच्या सुचनेवरुन बंद करत वाहतूक अश्विनी हॉटेल समोरून वळविण्यात आली.

शिरीष शिंदे , बीडमोठ्या अपघातास कारणीभूत ठरणारा अण्णा भाऊ साठे चौक अधीक्षकांच्या सुचनेवरुन बंद करत वाहतूक अश्विनी हॉटेल समोरून वळविण्यात आली. मात्र, वाहतूक समस्या अद्यापही कायमच आहे. येथे सिग्नल बसविणे अत्यंत जोखमीचे ठरणार असल्याचे वाहतूक पोलिसांचे मत आहे तर वाहनधारकांनाही वळण घेताना अपघाताचा धोका कायम असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पहाणीवरुन समजुन आले. त्यामुळे वीर हॉस्पिटलजवळ सिग्नल बसविल्यास तो सर्वांनाच फायदेशीर ठरेल असे मत सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे. शहरातून राष्ट्रीय मार्ग गेल्यामुळे दिवसरात्र हा रस्ता रहदारीने व्यस्त असतो. मालवाहू गाड्यांमुळे अनेकांचे प्राण अण्णा भाऊ साठे चौकात गेले आहेत. चौक हा अपघाताचे केंद्र असल्यामुळे तो कायमचा बंद करण्याचे धाडस अधीक्षक अनिल पारसकर यांनी केले. ही वाहतूक हॉटेल अश्विनी समोरुन वळविली. ज्यांना सुभाष रोडकडे जायचे आहे त्यांनी हॉटेल अश्विनीसमोरून वळून क्रीडा संकुलाकडे जाणाऱ्या किंवा वळण घेऊन सरळ जात साठे चौकातून खाली जाण्याचे नियोजन झाले. चार रस्ते जोडणारा मात्र चौक नसणारा रस्तासाठे चौक बंद केल्यामुळे हॉटेल अश्विनीकडे जाण्याऱ्यांची संख्या अधिक वाढली. हा भाग हा चौक होत नाही. कारण, सहयोगनगर भागातून येणारा रस्ता, हनुमान मंदिराकडून येणारा रस्ता समोरासमोर नाही. त्यामुळे चौक होत नाही. अशा परिस्थितीत येथे सिग्नल लावणे हा योग्य निर्णय नसल्याचे समोर आले. वीर हॉस्पिटलसमोरील जागा योग्य वीर हॉस्पिटलसमोर मोठी जागा आहे कारण त्या ठिकाणी पार्किंगसाठी जागा सोडली आहे तर समोर विरुद्धबाजुला मोकळी जागा आहे. या ठिकाणी सिग्नल बसविल्यास बसस्थानकाकडून येणारी वाहने थांबतील. तसेच त्यांना अश्विनी हॉटेलसमोर जाऊन वळण्याची गरज भासणार नाही. याचा लाभ व्यापाऱ्यांना होईल. वीर हॉस्पिटलसमोर सिग्नल झाला तर नागरिकांना लगेच सुभाष रोडला जाता येईल. तसेच वीर हॉस्पिटलाच्या बाजुला रस्त्याच्या बाजुला उभी राहणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे शक्य होईल, अशा प्रतिक्रीया सर्व सामान्य नागरिकातून व्यक्त होत आहेत.अश्विनी हॉटेलसमोर सिग्नल बसविण्याचा पेच वाहतूक पोलिसांसमोर निर्माण झाला आहे. या ठिकाणी सिग्नल बसविल्यास बसस्थानकाकडील येणारी वाहतूक सिग्नलवर येऊन थांबेल तर जालना रोडकडील येणारी वाहतूक ही दुसऱ्या बाजूने सिग्नलवर थांबेल. सिग्नल ग्रीन होण्यासाठी १ मिनिट २० सेकंदाचा कालावधी निश्चित केला तर यावेळेत मोंढा रोडकडे जाणारा रस्ता मोठ्या वाहनांमुळे ब्लॉक होईल. दुसरी बाब म्हणजे, सहयोगनगर भागातून व हनुमान मंदिराकडून येणारे वाहनधारक थांबु शकणार नाहीत. त्यांना जायचे असेल तर जालना रोडकडूून स्थानकाकडे व बसस्थानकाकडून जाणारी वाहने थांबली पाहिजेत. मात्र, सिग्नल त्या बाजुने असायला हवे हे होणे शक्य नाही. त्यामुळे या ठिकाणी सिग्नल बसविणे हा डोक्याला ताप होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.