शहरं
Join us  
Trending Stories
1
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
2
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
3
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
4
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
5
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
6
₹८०००० कोटींची फोडणी, मुकेश अंबानींच्या कंपनीला २ दिवसांत मोठं नुकसान; का झालं असं?
7
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?
8
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
9
Navratri Puja Vidhi 2024 :घटस्थापना आणि घट उत्थापन याचा शास्त्रोक्त विधी जाणून घ्या!
10
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
11
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
13
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
14
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
15
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
17
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
18
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
19
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
20
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश

एकीकडे टंचाई, दुसरीकडे अवकाळी; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६३ हेक्टरचे नुकसान

By विकास राऊत | Published: April 13, 2024 7:30 PM

२९२ शेतकऱ्यांच्या पिकांवर गारपीट

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात ९ ते ११ एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे २९२ शेतकऱ्यांचे १६३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. एकीकडे टंचाई तर दुसरीकडे अवकाळी संकट अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यात आहे. बागायत पिकांचे तीन दिवसांत सर्वाधिक नुकसान झाले, तर ३ जनावरांचा मृत्यू झाला. सहा मालमत्तांचे कमी-अधिक प्रमाणात पावसामुळे नुकसान झाले आहे. सिल्लोड तालुक्याला अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला. त्यानंतर कन्नड तालुक्यातील काही गावांमध्ये नुकसान झाले. जिल्ह्यात २.१ मि. मी. अवकाळी पावसाची नोंद झाली.

दरम्यान, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शुक्रवारी टंचाईचा आढावा घेतला. जिल्ह्यातील प्रकल्पांत उपलब्ध पाणीसाठा, अधिग्रहित विहिरी, लाभक्षेत्रातील विहिरींच्या अधिग्रहणाबाबत भूजल अधिनियमातील तरतुदी तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदींना अनुसरून प्रस्ताव पाठवावे. पाण्याचा अतिरिक्त वापर थांबवावा, असे आदेश त्यांनी दिले. 

टँकरने पाणीपुरवठा करताना टँकरला जीपीएस लावण्यात यावे. टँकरच्या फेऱ्यांचे नियोजन करावे. त्याचे गावात रजिस्टर ठेवून त्यावर गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घ्याव्या. लॉगबुक तयार करावे. टँकरच्या फेऱ्या व टँकर भरण्याचे ठिकाण याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करावी. जिल्ह्यात टंचाई उपाययोजना राबवताना जलपुनर्भरण, गाळ काढणे अशी कामे प्राधान्याने घ्यावी. जेणेकरून पुढील वर्षात टंचाई निर्माण होणार नाही, अशा सूचना त्यांनी केल्या. जिल्ह्यातील चारा बाहेर नेऊ नये, असे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. जिल्ह्यातील चाऱ्याची बाहेर वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास तसे पोलिसांना कळवावे. पशुधनासाठीही पिण्याच्या पाण्याची सोय करावी, असे ते बैठकीत म्हणाले.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीAurangabadऔरंगाबाद