शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

सोयाबीन बियाणे टंचाईची भिती

By admin | Published: May 20, 2014 12:04 AM

पालम : तालुक्यात शेतकर्‍यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेतली आहे़ दरवर्षी सोयाबीनच्या पेर्‍यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे़

पालम : तालुक्यात शेतकर्‍यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेतली आहे़ दरवर्षी सोयाबीनच्या पेर्‍यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे़ यावर्षी मात्र सोयाबीनच्या बियाणांची टंचाई होण्याची भिती निर्माण झाली आहे़ यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला असून, घरच्या बियाणांचा वापर करण्याच्या विचारात आहेत़ शेतकर्‍यांचे नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते़ दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनची काढणी करण्यात येते़ यामुळे सोयाबीनची विक्री करून दिवाळीचा सण धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो़ सोयाबीनसाठी बियाणे, रासायनिक खते व औषधींवर कमी खर्च होत असतो़ खर्चाच्या मानाने सोयाबीनचे उत्पादन चांगले होत असल्याने शेतकरी वर्ग सोयाबीनच्या पेरणीकडे मागील चार वर्षात वळला आहे़ सोयाबीन पिकाची काढणी झाल्यानंतर रबी हंगामातील पिके शेतकर्‍यांना घेता येतात़ यामुळे एका वर्षात दोन पिके निघत असल्याने सोयाबीनचा पेरा वाढत आहे़ मागील वर्षी सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली होती़ सलग पडणार्‍या पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन बरेचसे घटले होते़ यावर्षी शेतकरी सोयाबीनच्या पेरणीकडे जास्त वळले आहेत़ परंतु, बियाणे टंचाईने शेतकर्‍यांपुढे प्रश्न उभा केला आहे़ (प्रतिनिधी) घरच्या बियाणांचा वापर बाजारपेठेत यावर्षी सोयाबीनच्या बियाणांची उपलब्धता होणे कठीण आहे़ मागणीचा विचार करता २५ टक्क्याच्या आसपास बियाणे उपलब्ध होईल, असा अंदाज आहे़ यामुळे पेरणीच्या तोंडावर बियाणांची अडचण भासणार आहे़ ही बाब प्रशासनानेही ओळखली असून, शेतकर्‍यांनी घरच्या बियाणांचाच पेरणीसाठी वापर करावा, यासाठी जनजागृती केली जात आहे़ बाजारपेठेत बियाणे न मिळाल्यास शेतकर्‍यांना घरच्याच बियाणांचा आधार घ्यावा लागणार आहे़ चांगल्या बियाणांचा शोध शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरणीसाठी शेत तयार केले आहेत़ पाऊस पडताच बियाणांची पेरणी केली जाईल़ बाजारपेठेत आलेले बियाणे मिळेल त्या भावाने विकत घेतले जात आहे़ बियाणांची टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी घरच्या बियाणांकडे वळला आहे़ सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने महिनाभरापूर्वीच अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीनची विक्री केली आहे़ ज्या शेतकर्‍यांकडे सध्या सोयाबीन शिल्लक आहे अशा शेतकर्‍यांकडे दर्जेदार बियाणांची विचारणा केली जात आहे़ सोयाबीनमध्ये भेसळ नसेल तर ज्यादा पैसे मोजून चांगल्या प्रतीचे बियाणे खरेदी करण्याकडे शेतकर्‍यांचा कल आहे़ बीज प्रक्रिया करावी शेतकर्‍यांनी घरच्या बियाणांचा वापर करताना बीज प्रक्रिया करावी़ बीज प्रक्रियेची माहिती तालुका कृषी कार्यालय यांच्याकडून देण्यात येत आहे़ अधिकारी व कर्मचारी गावोगाव जाऊन शेतकर्‍यांना प्रक्रियेची माहिती देऊन प्रात्यक्षिक करून घेत आहेत़ बियाणे पेरणीपूर्वी शेतकर्‍यांनी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुरेंद्र पवार यांनी केले आहे़