शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

सावित्रीच्या ७७४० लेकींना शिष्यवृत्ती

By admin | Published: March 16, 2016 11:59 PM

हिंगोली : शाळेतील मागासवर्गीय मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे, हा उद्देश समोर ठेवत जि. प. समाजकल्याण विभागाकडून मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून अर्थसहाय्य केले जाते.

हिंगोली : शाळेतील मागासवर्गीय मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे, हा उद्देश समोर ठेवत जि. प. समाजकल्याण विभागाकडून मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून अर्थसहाय्य केले जाते. या योजनेत हिंगोली जिल्ह्यातील जि.प. प्राथमिक, अनुदानित-विनाअनुदानित व मान्यताप्राप्त शाळांतील ७७४० विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अर्थसहाय्य करण्यात आले आहे.समाजातील दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. विशेष म्हणजे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अर्थसहाय्य करून त्यांना आधार दिला जात असून जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून दुर्बल घटकांतील मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. तसेच पालकांनीही त्यांना नियमित शाळेत पाठवावे, हा त्यामागचा एकमेव उद्देश आहे. चालू शैक्षणिक वर्षामध्ये सावित्रीबाई फुले शिष्यवृती योजनेतंर्गत ५ वी ते ७ वी मधील एससी व व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थिनींना दरमहा ६०० रूपये याप्रमाणे तर अनुसूचित जातीमधील ८ वी ते १० मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरमहा १ हजार रूपये याप्रमाणे शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला असल्याची माहिती जि. प. समाजकल्याण विभागाने दिली. योजनेतंर्गत ६० लक्ष खर्च करण्यात आले आहेत. सदर रक्कम मुलींच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांची रक्कम रहिली आहे, त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अनुसूचित जातीमधील १६८० विद्यार्थी व २२५० विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला आहे.इंटरनेटमधील तांत्रिक अडचणी मुख्याध्यापकांची डोकेदुखी बनली असून वेळेत शिष्यवृत्ती अर्ज भरले जात नसल्याची ओरड आहे. त्यामुळे शासनकाडून अर्ज प्रक्रियेच्या तारखेत दरवेळेस बदल केजा जातो. जेणेकरून विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत.ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसते. त्यामुळे अर्ज करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. त्यात इंटरनेटच्या सुविधेत वारंवार होणारा बिघाड या विविध अडचणींळे अर्ज प्रक्रिया लवकर पूर्ण होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आॅनलाईन अर्ज भरण्याची तारीख वारंवार बदलते.