शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘स्कूल चले हम’! सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना; अर्ज कधी व कोठे करायचा?

By विजय सरवदे | Updated: June 20, 2024 18:01 IST

पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी हजारांपर्यंत शिष्यवृत्ती!

छत्रपती संभाजीनगर : मागासवर्गीय समाजातील मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, शिक्षणात मुलींची संख्या वाढावी, या उद्देशाने पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलींसाठी ‘सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती’ सुरू करण्यात आली आहे. या शिष्यवृत्ती योजनेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शालेय शिक्षणात मुलींचे प्रमाणही वाढले आहे.

मुलीला शिकवून तरी काय उपयोग? मुलगी दुसऱ्याच्या घरचे धन होणार आहे, या मानसिकतेतून वयात येण्याअगोदरच मुलींचा बालविवाह लावून देणे, अर्ध्यातच मुलींना शाळेतून काढून टाकणे, असा कल पालकांचा वाढला होता. ही मानसिकता बदलण्यासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवत असून, त्यास आता बऱ्यापैकी यश येत आहे. त्यापैकी सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना ही वरदान ठरत आहे. जिल्ह्यातील हजारो मुलींना या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळत असून, पालकांवर मुलींच्या शिक्षणावर होणार खर्चही कमी होत आहे. सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ही पाचवी ते दहावीतील अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील मुलींना दिली जाते. मात्र, यासाठी लाभार्थी विद्यार्थिनीची किमान ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनींना ६०० रुपये, तर आठवी ते दहावीतील विद्यार्थिनींना १ हजार रुपये प्रतिवर्षाला दिले जातात.

काय आहे सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना?प्रामुख्याने मागासवर्गीय प्रवर्गातील शालेय विद्यार्थिनींची शिक्षणातील गळती रोखून शाळेत मुलींची संख्या वाढावी आणि मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य मिळावे, या हेतूने शासनाने सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे.

५वी ते ७वीपर्यंत ६००, तर वरच्या वर्गाला हजार रुपयेया शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनींना ६०० रुपये, तर आठवी ते दहावीतील विद्यार्थिनींना १ हजार रुपये प्रतिवर्षाला दिले जातात.

निकष काय?या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनीची शाळेतील किमान ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य, हाच एकमेव निकष आहे.

कागदपत्रे काय लागतात?राष्ट्रीयीकृत बँकेत खाते, आधार कार्ड, मुख्याध्यापकांचा संबंधित प्रवर्गाचा दाखला, शाळा ही माहिती जमा करून समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करते.

अर्ज कधी व कोठे करायचा?या शिष्यवृत्तीसाठी मुख्याध्यापकांना आता ऑनलाइनही अर्ज करता येतो. मात्र, जि. प. समाज कल्याण जिल्हा कार्यालयात ऑफलाइन देखील अर्ज सादर करू शकतात.

गतवर्षी १८ हजार मुलींना लाभगेल्या वर्षी या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनु. जातीच्या इयत्ता ५वी ते ७वीपर्यंतच्या २१७३, तर ८वी ते १०वीपर्यंत ४७४२ विद्यार्थिनी, ओबीसी प्रवर्गाच्या इयत्ता ५वी ते ७ वीपर्यंतच्या १७१६, तर ८वी ते १०वीपर्यंत २३८७ आणि ‘व्हीजेएनटी’च्या ४०७६ अशा एकूण १८ हजार ९८३ मुलींना आर्थिक लाभ देण्यात आला.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबाद