शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
3
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
4
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
5
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
6
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
7
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
8
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
9
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
10
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
11
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
12
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
13
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
14
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
15
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
16
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
17
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
18
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
19
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
20
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला

हंगामी कामगारांनाही अपघातानंतर मिळतो विमा; अकरा महिन्यांत ५० प्रकरणात २५ लाख प्रदान

By साहेबराव हिवराळे | Published: January 04, 2024 7:11 PM

कामगार उपायुक्त कार्यालयाने कामगारांच्या अपघात विम्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

छत्रपती संभाजीनगर : हंगामी कामगारांना अपघात विमा दिला जातो. या ११ महिन्यांत कामगारांनी क्लेम टाकले असून, त्यापैकी कामावर जखमी होऊन तो मृत्यू पावलेला असल्यास त्याला विम्याचा लाभ देण्यात येतो. गतवर्षी किमान ५०च्या जवळपास कामगारांना २५ लाखाच्या जवळपास विम्याचा लाभ झाला आहे. बहुतांश फायली अद्यापही पेंडिंग आहेत, त्यावर काही विचार देखील झालेला नाही, कामगार उपायुक्त कार्यालयाने कामगारांच्या अपघात विम्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

काय आहे योजना?अपघात विमा ही योजना कामगारांचा कामाच्या दरम्यान अपघात होऊन मृत्यू झाल्यास तो या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे. त्याच्या कुटुंबीयाला तो विम्याचा लाभ घेता येतो. जखमी असल्यास त्यास उपचारासाठी देखील निधी उपलब्ध केला जातो. हंगाम कामगार नोंदणी केली की त्याचा विमाही उतरविला जातो.

नोंदणी कशी करणार?दरवर्षी तुम्हाला नोंदणी करणे गरजेचे असून, ती नोंदणी केल्यावर सरकारने ठरवून दिलेल्या योजनेत तुम्हाला लाभ घेता येतो. अपघात तसेच इतर गंभीर आजारी असल्यास तुम्हाला त्यावेळी दवाखान्यात उपचार देखील घेणे सोयीचे होते. ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष ही कार्यालयात जाऊन तुम्हाला नोंदणी करणे शक्य आहे.

निकष काय?या योजनेअंतर्गत कामगाराला महिना फक्त १/- रुपये भरून २ लाखांपर्यंत विम्याचा लाभ घेता येईल. कामगार कोणत्या ठेकेदाराकडे काम करतो, त्याची नोंदणी अपडेट असावी, एकाच ठिकाणी विम्याचा लाभ घेता येईल त्यासाठी ठरवून दिलेल्या नियमावलीचा वापर तुम्हाला करावा लागणार आहे.

किती विमा मिळतो?दोन लाखाचा विमा असून, त्यात कामगारांचा विमा उतरविला जातो. इतरही त्याला किरकोळ लाभ दिले जातात, त्याचा क्लेम तुम्हाला रीतसरपणे कार्यालयाकडे दाखल करावे लागतात.

जीवनात प्रत्येक नागरिकाचा विमा असावाआर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणाने तसेच विम्याचा प्रीमियम जास्त असल्याकारणामुळे विमा काढणे प्रत्येक नागरिकाला शक्य नसते. त्यामुळे तो विम्यापासून वंचित राहतो परिणामी अपघात झाल्यावर त्याला औषधोपचारासाठी आर्थिक सामना करावा लागतो.

विमा योजनेचा लाभया सर्व गोष्टींचा विचार करून राज्य शासनाने राज्यातील बांधकाम कामगारांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला.- कामगार आयुक्त

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक