शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

अनेक तलाठी एकाच उपविभागात सहा वर्षांपासून ठाण मांडून; जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती पत्रांचा ढीग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 8:03 PM

पहिल्या टप्प्यात ११५ जणांच्या बदल्या होणार

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील अनेक तलाठ्यांना एकाच उपविभागात सहा वर्षांचा कालावधी झाला असून, त्यांच्या बदल्या होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ११५ तलाठ्यांच्या बदल्यांची यादी तयार करण्यात आली. त्या यादीला अद्याप विभागीय प्रशासनाने मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे कुणाची कुठे बदली झाली हे समोर आलेले नाही. दरम्यान, बदल्यांच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती अर्जांचा ढीग लागला. शहर व परिसरात अनेक तलाठी मागील सहा वर्षांहून अधिक काळापासून येथेच ठाण मांडून आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे बदल्यांचे अधिकार असताना अनेक जण आपल्या सोयीनुसार बदल्या करून घेतात. परंतु, जे तलाठी ग्रामीण भागात कार्यरत आहेत, त्यांना मात्र शहरात येण्याची संधीच मिळाली नाही. सहा वर्षांपर्यंतचा कालावधी एकाच ठिकाणी काढला की, पदोन्नती होऊन पुन्हा त्याच उपविभागात बदली करून घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातून अनेकांचे लागेबांधे वाढतात. त्यामुळे त्यांना बदली नकोशी वाटते.

इतरांना तीन वर्षांचा नियममहसूलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून इतरांना तीन वर्षांचा बदलीचा नियम आहे. परंतु, तलाठ्यांना एकाच तालुक्यात सहा वर्षे का ठेवावे, त्यांचीही तीन वर्षांनी बदली का करू नये, असा प्रश्न आहे. अनेक तलाठी कार्यालयात नसतात. हाताखालील कर्मचारीच कामकाज पाहतात. फेर घेण्यास तलाठी टाळाटाळ करतात. १५ ते ३० दिवसांचा नियम असताना, तीन-तीन महिने फेर मंजूर करीत नाहीत. हीदेखील वस्तुस्थिती आहे.

अध्यक्षांचा मेसेज व्हायरलमहसूलमंत्र्यांच्या भेटीचा प्रयत्न केला, मात्र भेट होऊ शकली नाही. तथापि आम्ही इतर मागण्यांसाठी संबंधितांकडे पाठपुरावा केला. तलाठी बदल्यांबाबत सर्व जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना भेटावे. तीन वर्षांच्या आत काळ झालेल्या सजावरून बदली करू नये. तालुक्यात सहा वर्षे झाल्याशिवाय बदली होणार नाही. यासाठी प्रशासनाकडे आग्रही राहून पाठपुरावा करावा. जास्तीत जास्त सभासदांना न्याय मिळवून द्यावा, असा मेसेज राज्य तलाठी महासंघाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांच्या नावे सोशल मीडियातून सगळ्या तलाठी संघटनांच्या ग्रुपमध्ये व्हायरल केला.

११५ जणांच्या बदल्या होतीलएकूण पदांच्या ३० टक्के तलाठ्यांच्या बदल्यांची यादी १४ ऑगस्ट रोजी तयार केली. जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम केलेली यादी विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवली आहे. मंजुरी मिळताच लगेच बदलीचे आदेश जारी केले जातील.- विनोद खिरोळकर, निवासी उपजिल्हाधिकारी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादTransferबदली