शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्याबाबत सकारात्मक अहवालासाठी मारहाणीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2021 5:17 PM

Shiv Sena MP Bhavana Gawli : खासदार भावना गवळी यांच्यावर सहकारी कारखाना विक्रीमध्ये कोट्यवधीचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे.

ठळक मुद्दे शासनाला उत्तर दाखल करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळया प्रकरणी पुढील सुनावणी ३० ऑगस्टला होणार आहे

औरंगाबाद : वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्यावरील कोट्यवधीच्या आर्थिक घोटाळ्याबाबत सकारात्मक अहवाल देण्यास नकार दिल्यामुळे औरंगाबादचे सनदी लेखापाल उपेंद्र गुणवंतराव मुळे यांना गुंडामार्फत मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेच्या अनुषंगाने शासनास उत्तर दाखल करण्यासाठी २ ऑगस्‍ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. के. जाधव व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी ४ आठवड्यांचा वेळ दिला आहे. याचिकेवर पुढील सुनावणी ३० ऑगस्‍ट रोजी होणार आहे.

काय आहे प्रकरण?खासदार भावना गवळी यांच्यावर सहकारी कारखाना विक्रीमध्ये कोट्यवधीचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणाशी संबंधित सकारात्मक अहवाल तयार करुन देण्यासाठी गुंड सईद खानमार्फत दबाव टाकून मारहाण केल्याबाबत सनदी लेखापाल उपेंद्र मुळे (रा. दौलत बंगला, प्लॉट क्र. ६९, मुकुंद हाऊसिंग सोसायटी, महाजन कॉलनी, एन-२, सिडको, औरंगाबाद ) यांनी पोलीस ठाण्यात आणि औरंगाबादच्या पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रारी दिल्या होत्या. परंतु पोलिसांनी दखल न घेतल्याने अखेर मुळे यांनी खंडपीठात धाव घेतली होती. सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी शपथपत्राव्‍दारे उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागून घेतला.

नागपूर खंडपीठात याचिकासनदी लेखापाल मुळे यांचे खासदार गवळी यांच्याशी २००८ पासून व्यावसायिक संबंध होते. दरम्यान, श्री बालाजी सहकारी पार्टिकल बोर्ड कारखान्याच्या विक्रीत कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुख हरीश सारडा यांनी याचिका दाखल केली होती. या प्रकरणात खासदार गवळी यांनी बेकायदेशीर आणि अवैध कागदपत्रे तयार करण्यासाठी मुळे यांना सप्टेंबर २०१९ मध्ये सांगितले होते. मात्र, मुळे यांनी बेकायदेशीर लेखा परीक्षण अहवाल तयार करण्यास नकार दिला होता. तरीही खासदार गवळी यांनी मुळे यांच्यावर दबाव टाकून अहवाल बनविण्यासाठी गुंडांमार्फत धमक्या आणि मारहाण केल्याचाही प्रकार घडला होता. त्याविरोधात मुळे यांनी ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी औरंगाबादचे पोलीस आयुक्त यांच्याकडे खासदार गवळी यांच्यासह सईद खान व अन्य ५ ते ६ जणांविरुध्द तक्रार दिली होती. त्यानंतर खासदार गवळी यांनी हस्तकामार्फत मुळे यांच्याविरुध्द अपहाराचे ५ खोटे गुन्हे महाराष्ट्रात विविध ठिकाणी दाखल केले. याशिवाय मुळे यांच्या घरी गुंड येऊन धमक्या देऊ लागल्यामुळे ते घर सोडून हॉटेलात राहू लागले होते. पोलीस तक्रार नोंदवून घेत नसल्यामुळे १२ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. मुळे यांच्या बाजूने अ‍ॅड. अमोल गांधी बाजू मांडत आहेत.

टॅग्स :Bhavna Gavliभावना गवळीShiv SenaशिवसेनाCrime Newsगुन्हेगारीAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ