शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

टंचाईच्या उपाययोजना रखडल्या

By admin | Published: December 14, 2015 11:52 PM

लातूर : लातूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असतानाही अद्याप प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या नाहीत़ त्यामुळे नागरिकांची होरपळ सुरू आहे़

लातूर : लातूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असतानाही अद्याप प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या नाहीत़ त्यामुळे नागरिकांची होरपळ सुरू आहे़ याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी गांभीर्याने पाहत नसल्याने पाण्याचा अक्षरश: खेळ झाला आहे़ सर्वसामान्य नागरिकांना सांडपाणीही विकत घेण्याची वेळ आली आहे़ हेच चित्र ग्रामीण भागातही दिसून येत आहे़ दुष्काळात पाणी विकत घेऊन प्यायची वेळ आली असल्याने शासनाकडून कधी उपाययोजना होणार याकडे शहरवासियांबरोबरच संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे़ दरम्यान, पाण्यासाठी नागपुरात विधान भवनासमोर महापौरांचे धरणे आंदोलन सुरू झाले आहे.लातूर शहराला गेल्या तीन वर्षांपासून पाणीटंचाईचे चटके सुरू आहेत़ यावर्षी तीव्रता अधिक असून फेब्रुवारीनंतर शहरावासियांचे हाल होणार आहेत़ मांजरा प्रकल्पात असलेल्या पाण्यावर आणखी दोन ते अडीच महिने लातूरकरांची तहान भागणार आहे, त्यानंतर मात्र काय उपाययोजना असतील यावर अद्यापही प्रशासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही़ उजनीच्या धरणातून लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी आरक्षित करण्यात यावे़ उजनी ते लातूर शहरापर्यंत स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात यावी यासाठी लागणारा ६८८ कोटी रूपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे़ त्याचबरोबर शासनाने २०० फुटांपेक्षा अधिक खोल विंधन विहीर घेण्यास बंदी घातली असल्याने विंधन विहिरींचाही उपयोग होत नाही़ त्यामुळे विंधन विहिरीचा नियम शिथिल करून ४५० फुट खोलीपर्यंत विंधन विहिर घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे़ नागपूरच्या विधान भवनसमोर महापौरांसह पदाधिकाऱ्यांनीही धरणे आंदोलनात सहभाग नोंदविला आहे़ यात उपमहापौर कैलास कांबळे, स्थायी समितीचे सभापती पप्पू देशमुख, गटनेते नरेंद्र अग्रवाल, प्रभाग समितीच्या सभापती सपना किसवे, श्रीदेवी औसे, अ‍ॅड़ समद पटेल, प्रभाग समितीचे माजी सभापती प्रा़ राजकुमार जाधव, रूपाली साळुंके, केशरबाई महापुरे, उषा कांबळे आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश आहे़ (प्रतिनिधी)