शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

अंतर्गत जलवाहिन्यांची झाली चाळणी; ठिकठिकाणी वाहिन्या फुटून रस्त्यावर वाहताहेत पाण्याचे लोट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 2:22 PM

जलवाहिन्या बदलण्याकडे महापालिकेने कधीच लक्ष दिले नाही. त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत.

ठळक मुद्देजुन्या शहरातील जलवाहिन्या नगर परिषद काळात टाकण्यात आल्या आहेत. या जलवाहिन्यांचे आयुष्य किमान दोन दशकांपूर्वी संपलेले आहे.

औरंगाबाद : शहराची तहान भागविण्यासाठी राज्य शासनाने १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केले. शहरात पाणी आणणाऱ्या जलवाहिन्यांचे आयुष्य जसे संपलेले आहे तसेच अंतर्गत जलवाहिन्याही कमकुवत झाल्या आहेत. मंगळवारी शहरात ठिकठिकाणी जलवाहिन्या फुटण्याचे सत्र सुरू होते. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले. 

जुन्या शहरातील जलवाहिन्या नगर परिषद काळात टाकण्यात आल्या आहेत. या जलवाहिन्यांचे आयुष्य किमान दोन दशकांपूर्वी संपलेले आहे. जलवाहिन्या बदलण्याकडे महापालिकेने कधीच लक्ष दिले नाही. त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत. मंगळवारी रात्री गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागील रोडवर जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी चौकात वाहत होते. ज्या ठिकाणी जलवाहिनी फुटली तेथे फुलांची झाडे विकणारे नागरिक आपल्या कुटुंबासह राहत होते. जलवाहिनी फुटल्याने या कुटुंबांची वाईट अवस्था झाली. फुटलेली जलवाहिनी एमआयडीसीची असू शकते असा युक्तिवाद महापालिकेकडून करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत जलवाहिनी कोणाची हे शोधण्याचे काम महापालिकेकडून करण्यात येत होते.

पुंडलिकनगर जलकुंभावरून जाणारी ही जलवाहिनी ३०० मि.मी. व्यासाची असून, ती महापालिकेची असल्याचे उशिरा सांगण्यात आले. मोंढ्यातील चौकात जलवाहिनीला गळती लागल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत होते. विशेष बाब म्हणजे जलवाहिनीतून पाणी वाया जात असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना नव्हती. ज्या अधिकाऱ्याकडे हा परिसर आहे, त्यांनी रात्री उशिरा माहिती घेतल्यानंतर गळती असल्याचे मान्य केले, तसेच बुधवारी काम सुरू होईल असे सांगितले. चंपा चौक येथे मागील काही दिवसांपासून जलवाहिनीला गळती लागली आहे. मात्र, येथे गळती नसल्याचा दावा उपअभियंत्यांनी केला.

मोंढ्यातील जलवाहिनी फुटलीजुन्या मोंढ्यातील जलवाहिनी  फुटून  मागील ४ दिवसापासून रस्त्यावर पाणी वाहते आहे. जिन्सी परिसरातील जलकुंभाला पाणीपुरवठा करणारी ही जलवाहिनी जुन्या मोंढ्यातील सर्कल येथे फुटली आहे. त्यातून हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत जाऊन जाफरगेट परिसरातील खड्ड्यात तुंबत आहे. त्यात येथे मागील आठवडाभरापासून तीन ठिकाणी ड्रेनेज लाईन तुंबली आहे. ते सुद्धा पाणी खड्ड्यात साठून संपूर्ण जाफरगेट परिसरात दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे येथून हाकेच्या अंतरावर महानगरपलिकाचे झोन कार्यालय आहे. येथील कर्मचाऱ्यांना जलवाहिनी व ड्रेनेज दुरुस्तीची विनंती केली असता आमच्या झोन अधिकाऱ्याला येऊन भेटा, असे उत्तर कर्मचारी देत असल्याचे सतीशचंद्र सिकची यांनी सांगितले.

चंपाचौकत जलवाहिनी फुटलीमागील आठवड्यापासून चंपाचौक येथे जलवाहिनी फुटली आहे. जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचते आहे.  रिक्षा, दुचाकी खड्ड्यात आदळत आहेत. येथील दुकानदारांनी सांगितले की, मागील आठवड्यापासून जलवाहिनी फुटली आहे. पण महानगरपालिकेचे कर्मचारी फिरकले नाही. जलवाहिनी दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादWaterपाणी