शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
2
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
3
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
4
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
5
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
6
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
7
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
8
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
9
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
10
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
11
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
12
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
13
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
14
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
15
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
16
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
17
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
18
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
19
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
20
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...

मोबाईल ‘डेटा’च्या ‘मापात पाप’? दिवस मावळण्यापूर्वीच संपतो ‘पॅक’, छोटे ‘रिचार्ज’ची नामुष्की

By संतोष हिरेमठ | Published: March 14, 2024 11:17 AM

इंटरनेट, सोशल मीडिया आणि आता ‘एआय’ वापराच्या काळात मोबाईलधारकांना दिवसभरात दीड जीबी, दोन जीबी डेटा कसा संपतो, हे कळत नाही.

छत्रपती संभाजीनगर : मोबाईलचा डेटा अचानक संपत असल्याचा अनुभव मोबाईलधारकांना येत आहे, तर अनेकजण साधा मोबाईल वापरतात. अशा मोबाईलधारकांना रिचार्ज मारताना काही ''''जीबी'''' डेटा मिळतो; परंतु मोबाईल साधा असल्याने तो वापरलाच जात नाही. मग हा डेटा कुठे जातो, मोबाईलच्या ''''डेटा''''त ''''काटा'''' मारला जात आहे का, असा सवाल मोबाईलधारकांकडून उपस्थित केला जातो आहे.

इंटरनेट, सोशल मीडिया आणि आता ‘एआय’ वापराच्या काळात मोबाईलधारकांना दिवसभरात दीड जीबी, दोन जीबी डेटा कसा संपतो, हे कळत नाही. कोणी सतत मोबाईलवर सक्रिय असतो, तर कोणी दिवसभरात काही वेळेसाठी मोबाईलचा वापर करतात. या सगळ्यांना मोबाईलचा डेटा संपत असल्याचा अनुभव येतो. ‘डेटा’ संपताच छोट्या किमतीचा ‘रिचार्ज’ मारण्याची वेळ ओढावत आहे. मोबाईलमधील इंटरनेट ‘स्पीड’, डाऊनलोडिंग , व्हिडीओची गुणवत्ता आदींवर ‘डेटा’ वापर ठरतो, असे एका कंपनीच्या कर्मचाऱ्याने सांगितले.

छोट्या रकमेचे ‘रिचार्ज’ विविध कंपन्यांकडून काही तासांसाठी, एका दिवसासाठी, दोन-तीन दिवसांची मुदत असलेले छोट्या रकमेचे डेटा ‘रिचार्ज’ची सुविधा दिली जात आहे. दिवसभरातील डेटा अचानक संपेल आणि हे छोटे रिचार्ज मारले जातील, यासाठीच ते आणले का, असा सवाल मोबाईलधारक उपस्थित करीत आहेत.

असे तुमच्यासोबत होते का? अचानक ‘डेटा’ संपल्याचा मेसेज? मोबाईलचा वापर करताना काही वेळ होत नाही, तोच आधी ‘तुमचा दिवसभरातील ५० टक्के डेटा वापरून झाला आहे...’ असा मेसेज येतो. त्यानंतर मोबाईलधारक नेटचा वापर कमी करतो. त्यानंतर डेटा संपल्याचा मेसेज येतो. त्यामुळे अनेकांना नाईलाजाने काही तासांसाठीचा ‘रिचार्ज’ मारावा लागत असल्याचे मोबाईलधारकांनी सांगितले.

साधा मोबाईल, मग डेटा कुठे जातो? केवळ बोलण्यासाठी साध्या मोबाईलचा वापर होतो. मात्र, जेव्हा ‘रिचार्ज’ टाकला जातो, तेव्हा काही ‘जीबी’ डेटाही मिळत असतो. साधा मोबाईल असल्याने हा डेेटा वापरलाच जात नाही. मग डेटा कुठे जातो, असा सवाल मोबाईलधारकांनी उपस्थित केला.

मोबाईलवर ‘४जी’ची रेंज, पण नेट ठप्पमोबाईलवर ‘४जी’ची रेंज असते; परंतु अचानक इंटरनेटच ठप्प पडते. ‘डेटा’ असतो, ‘रेंज’ असते. मात्र, तरीही इंटरनेट काम करत नाही, असे वारंवार होते. आवश्यकतेच्या वेळेत डेटा वापरताच येत नाही, असेही काही मोबाईलधारकांनी सांगितले.

पारदर्शकतेची अपेक्षा नाहीनफ्याच्या उद्देशाने कंपन्या काम करतात. त्यांच्याकडून पारदर्शकतेची अपेक्षा करू नये. सरकारी कंपनीत ग्राहकांना अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येते. खासगी कंपन्यांत तक्रार करणे अवघड होते.- रंजन दाणी, महाराष्ट्र सचिव, नॅशनल फेडरेशन ऑफ टेलिकॉम एम्प्लॉइज, बीएसएनएल

रेंज फुल, तरीही अचानक नेट चालत नाहीमोबाईलमध्ये २ ‘जीबी’चा डेटा असूनही अनेकदा अचानक काही वेळेसाठी इंटरनेट चालत नाही. ‘४जी’ची रेंजही फुल दाखवित असते. तरीही नेट चालत नाही. व्हिडीओ पाहणे सोडा, एखादा विषय सर्चदेखील होत नाही. हे वारंवार होते. दिवसभरातील डेटा वापरताच येत नाही.- सय्यद नजीब, मोबाईलधारक.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMobileमोबाइलSocial Mediaसोशल मीडिया