शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

नक्षत्रवाडीत ६ जलशुद्धीकरण केंद्र; नवीन पाणीपुरवठा योजनेत ४० कोटी लिटर पाण्याचे शुद्धीकरण

By मुजीब देवणीकर | Published: April 03, 2024 1:09 PM

नक्षत्रवाडी येथील डोंगराच्या पायथ्याशी सहा वॉटर फिल्टर बेड उभारण्यात येत आहेत. या ठिकाणी दररोज ४० कोटी लिटर पाण्यावर प्रक्रिया भविष्यात होईल.

छत्रपती संभाजीनगर : २७४० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर ४० कोटी लिटर पाण्यावर दररोज शुद्धीकरण करता येईल. सध्या दररोज फक्त साडेतेरा कोटी लिटर पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया होत आहे.

२७४० कोटी रुपयांच्या योजनेत महापालिकेला ८२२ कोटी रुपयांचा वाटा टाकावा लागणार आहे. पालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही, राज्य शासन मनपाला सॉफ्ट लोनच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या कामात निधीची अडचण भासणार नाही. पाणीपुरवठा योजनेसाठी नक्षत्रवाडी येथील डोंगराच्या पायथ्याशी सहा मोठे जलशुद्धीकरण केंद्र तयार केले जात आहे. या केंद्रात ८० फिल्टर बेड असणार आहेत. यापैकी ३० फिल्टर बेडचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. फिल्टर बेड्सच्या माध्यमातून रोज ३९२ एमएलडी (चाळीस कोटी लिटर) पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाणार आहे. 

शुद्धीकरणाची प्रक्रिया केलेले पाणी शहरवासीयांना सहा वेगवेगळ्या जलवाहिन्यांद्वारे दिले जाणार आहे. त्यामुळे रोज पाणीपुरवठा होईल, असा दावा केला जात आहे. सध्या फारोळ्यात रोज १३० ते १३५ एमएलडी पाण्यावर (साडेतेरा कोटी लिटर पाण्यावर) शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जात आहे.

चाळीस कोटी लिटर पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केल्यावर हे पाणी नक्षत्रवाडीच्या डोंगराच्या पायथ्याशी बांधलेल्या संपमध्ये (जमिनीखालील जलकुंभ) साठवले जाणार असून संपमधील पाणी पंपांच्या सहाय्याने डोंगरावरील एमबीआरमध्ये चढवले जाणार आहे. एमबीआरमधून गुरुत्वाकर्षण पद्धतीने पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवले जाणार आहे. संपमधून एमबीआरपर्यंत पाणी चढविण्यासाठी १२७० अश्वशक्तीचे पाच पंप आणि ९०० अश्वशक्तीचे पाच पंप वापरले जाणार आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबादWaterपाणी