शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले; आधी पिके गेली आता वीज कोसळून १५ जनावरे दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 16:20 IST

rainfall in Aurangbad : दोन वेगवेगळ्या घटनांत चार शेतकऱ्यांची १५ जनावरे दगावली

कन्नड ( औरंगाबाद ) : तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज कोसळल्याने चार शेतकऱ्यांची १५ पाळीव जनावरे मृत्युमुखी पडल्याची घटना आज दुपारी घडली. एका ठिकाणी यात १ बैल, ७ गाई, ३ गोऱ्हे व वासरू तर दुसऱ्या ठिकाणी दोन म्हशी व व वगारू दगावले आहे. ( 15 animals were killed due to lightning ) आधीच अतिवृष्टीने ( Heavy rainfall in Aurangabad ) कंबरडे मोडलेला शेतकरी या अपघाती घटनेमुळे हतबल झाला आहे.

अतिवृष्टीने हातची पिके गेल्याने शेतकरी मोडून पडला आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांची भिस्त पशुधनावर आहे. जेहूर - ठाकूरवाडी व उंबरखेडा येथील काही शेतकरी गायरानात आपली जनावरे चरण्यासाठी घेऊन गेली होती. दरम्यान, दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. यावेळी जेहूर - ठाकूरवाडीजवळ गट नंबर ७० मधील गायरानात वीज कोसळली. यात शिवराम मेंगाळ यांचे ३ (२ गाय व वासरू), पुंजाराम मधे यांचे ८ (५ गाय ३ वासरु) व अंबादास मेंगाळ यांचा १ बैल दगावला. तर दुसऱ्या घटनेत उंबरखेडा येथील अविनाश नामदेव निकम यांच्या शेतात (गट क्र ६१) सुद्धा वीज कोसळल्याने दोन म्हशी व एक वगारु मृत झाले.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादRainपाऊस