शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

कॅशलेस प्रणालीद्वारे धान्य वितरणास प्रारंभ

By admin | Published: January 14, 2017 12:30 AM

जालना : राज्यशासनाने स्वस्त धान्य दुकानांमार्फत होणारा काळा बाजार रोखण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरण करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतलेला आहे.

जालना : राज्यशासनाने स्वस्त धान्य दुकानांमार्फत होणारा काळा बाजार रोखण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरण करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतलेला आहे. जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर त्याचा शुंभारंभ करण्यात आला असून, यासाठी लाभार्थ्यांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी केले आहे.स्वस्तधान्य वितरण प्रणाली पारदर्शक करण्यासाठी बायोमेट्रीक पद्धतीने धान्य वितरणाचा शुभारंभ शहरातील शास्त्रीमोहल्ला येथील दुकान नं ३२ मधून जिल्हाधिकारी जोंधळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी केशव नेटके, जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर, तहसीलदार विपीन पाटील, नायब तहसीलदार एन. वाय. दांडगे आदींची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले की, राज्यशासनाने गोरगरीबांच्या कल्याणासाठी कल्याणकारी व क्रांतीकारक असा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार स्वस्त धान्य दुकानातून वितरित होणारे धान्य हे ई- ‘पॉस’ मशिनच्या सहाय्याने वितरित करण्यात येणार आहे. यासाठी कुटुबांतील व्यक्तीचा आधारकार्ड नंबर व बोटाचे ठसे घेण्यात येत आहेत. यात किती धान्य व किती रूपये झाले याची पावती ताबडतोब मिळते. त्या पावतीनुसार पैसे देऊन किंवा कार्ड स्क्रॅच करून धान्य घेता येईल. यामुळे धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी कमी होण्यासोबतच धान्याचा काळाबाजार रोखण्यासही मदत होणार आहे. सध्या जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर दोन ठिकाणी या योजनेचा शुभारंभ झाला असून, २८ फेबु्रवारी पर्यंत जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांना या मशिन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यासाठी सर्व दुकानदारांसह नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)