शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

सरकार मराठा, ओबीसी समाजाला गाजर दाखवत आहे; अंबादास दानवे यांचा आरोप

By बापू सोळुंके | Updated: July 15, 2024 19:34 IST

सरकार जेव्हा अडचणीत असते तेव्हा त्यांना विरोधी पक्ष आठवतो: अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगरः मराठा आरक्षणाचे नेते  मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषणाचा इशारा द्यावा लागला. हे सरकार मराठा आणि ओबीसी समाजाला गाजर दाखवत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते आ. अंबादास दानवे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला.

मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी राज्यसरकारने बोलावलेल्या सर्वपक्षिय बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकल्यामुळे  तुमच्यावर टिका होत आहे, याकडे दानवे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, आम्ही आधीपासून म्हणतो की, मराठा आरक्षणाविषयी सरकारने भूमिका स्पष्ट करावी. मात्र सरकार त्यांची  भूमिका स्पष्ट करत नाही. सरकार जेव्हा अडचणीत असते तेव्हा त्यांना विरोधी पक्ष आठवतो, अशी टिकाही आ.दानवे यांनी केली. आमच्या पक्षप्रमुखांनी आधीच आरक्षणाची मर्यादा वाढविण्याची भूमिका स्पष्ट केली असल्याचे त्यांनी नमूद केले.

महायुतीच्या सरकारने बजेटपेक्षा दहा पट खर्चाच्या निविदा काढल्यामहायुतीचे सरकार हे टक्क्केवारीचे सरकार असल्याचा आरोप करीत आ.दानवे म्हणाले की,सार्वजनिक बांधकाम विभागासाठी केवळ १८ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर असताना राज्य सरकारने या विभागाच्या सुमारे सव्वा लाख कोटी रुपयांच्या विकास कामाच्या निविदा काढल्या आहेत. यामुळे आर्थिक ताळमेळ नसलेले हे सरकार आहे.

विधीमंंडळात मराठवाड्याच्या विविध प्रश्नांवर आवाज उठविलाआ. दानवे म्हणाले की, काल परवा संपलेले राज्य विधीमंडळाचे अधिवेशन हे या सरकारचे शेवटचे अधिवेशन होते. विरोधी पक्षनेता म्हणून आपण मराठवाड्यासंबंधी विविध प्रश्न उपस्थित केल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकरी पीक विमा, गर्भलिंग निदान चाचणीचे नुकतेच उघडकीस आलेली प्रकरणे, सातारा परिसरातील रहिवाशांना करण्यात येत असलेली गुंठेवारीची सक्ती संदर्भातही आवाज उठविल्याचे ते म्हणाले. 

जगप्रसिद्ध वेरूळ लेण्या दहशतवाद्यांच्या टार्गेटवरनुकत्याच पकडण्यात आलेल्या इसिस संबंधित अतिरेक्यांच्या टार्गेटवर जगप्रसिद्ध वारसास्थळ असलेली वेरूळची लेणी असल्याचे समोर आले आहे. असे असताना केंद्रीय पुरातत्व विभाग लेण्यांच्या सुरक्षेसंदर्भात  गंभीर नसल्याचा आरेाप आ.दानवे यांनी केला. ते म्हणाले की,मागील वर्षभरात सुमारे २५ लाख पर्यटकांनी लेण्यांना भेटी दिल्या. यात विदेशी पर्यटकांची संख्याही अधिक हाेती. यामुळे अजिंठा आणि वेरूळ लेण्या, बीबी का मकबरा च्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आपण शासनाकडे केल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबाद