शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

पर्यटन स्थळांची वाताहत थांबवा!

By admin | Published: January 22, 2016 12:11 AM

विकास राऊत , औरंगाबाद राज्यातील औरंगाबाद हे एक महत्त्वाचे, मध्यवर्ती, औद्योगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटन केंद्र असून येथील पर्यटन स्थळांची वाताहत होत आहे.

विकास राऊत , औरंगाबादराज्यातील औरंगाबाद हे एक महत्त्वाचे, मध्यवर्ती, औद्योगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटन केंद्र असून येथील पर्यटन स्थळांची वाताहत होत आहे. त्यांच्या संवर्धनाकडे शासन आणि मनपाने तसेच जिल्हा प्रशासनाने मिळून लक्ष देण्याची मागणी लोकमतने केलेल्या एका पाहणीतून पुढे आली आहे.बहुतांश पर्यटन स्थळांतील साफसफाई वेळेत होत नाही. कचऱ्यांचे ढिगारे तेथेच पडलेले असतात. पिण्याचे पाणी आणि पार्किंगची सुविधा नसते. पार्किंगमध्ये बाहेरगावाहून आलेल्या पर्यटकांची लूट होते. काही पर्यटन स्थळे विद्रूप केली जात आहेत. त्यांचे संरक्षण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शहरातील ऐतिहासिक दरवाजांची पडझड होत आहे. त्यांची डागडुजी आणि देखभाल करण्यासाठी मनपाने लक्ष दिले पाहिजे. शहर व जिल्ह्यात देशी-विदेशी पर्यटक येतात. त्यांनी येथील ऐतिहासिक वास्तू पाहून समाधान व्यक्त केले पाहिजे; परंतु तसे काहीही दिसून येत नाही.काही पर्यटन स्थळांच्या आडोशाने तळीराम आपली मैफल जमवितात. त्यामुळे अनेक वास्तंूमध्ये घाणेरडा कचरा साचून राहतो. वास्तूंचे संवर्धन होण्यासाठी जनजागृतीची गरजदेखील सर्व्हेतून पुढे आली आहे. ४०० वर्षांहून अधिक जुन्या ऐतिहासिक वास्तू आजही आहेत; परंतु त्या पूर्णरूपात नसून त्यांची पडझड होत आहे. ५२ दरवाजांचे हे शहर नावापुरते राहण्याची शक्यता पुढील काळात नाकारता येत नाही. औरंगाबादला दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. आजही जुन्या औरंगाबाद शहरात अशी अनेक महाद्वारे अर्थात दरवाजे आहेत. औरंगाबाद शहराचे जुने नाव खडकी असे होते. इतिहासकारांनी मलिक अंबर याने हे शहर वसविल्याचे नमूद केले आहे. सुरक्षारक्षक असावेतऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि स्वच्छता अबाधित राहावी, यासाठी शासन, महापालिका आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. पर्यटनाची माहिती सर्वत्र देण्यासाठी नागरिकांनीदेखील शहराचा नावलौकिक सांगितला पाहिजे.अनेक पर्यटन स्थळे सुरक्षारक्षकांअभावी आहेत. त्यामुळे तेथील वास्तूंची नासधूस होत आहे. वास्तूंच्या भिंतीवर कुठलाही मजकूर लिहिण्याचे प्रमाण वाढले आहे. अजिंठा, वेरूळ, पितळखोरा आणि विद्यापीठ परिसरात औरंगाबाद लेण्या आहेत. गौताळा हे अभयारण्य आहे. सारोळा आणि म्हैसमाळ ही हिलस्टेशन्स शहरापासून काही अंतरावर आहेत. विद्यापीठ परिसरात सोनेरी महल आणि इतर काही ऐतिहासिक वास्तू आहेत. तेथून काही अंतरावर बीबी का मकबरा आहे. मकबऱ्यापासून १ कि़ मी.अंतरावर पाणचक्की आहे. शहरातील ५२ पैकी काही दरवाजे नामशेष झाले असून भडकल, रोशन, मकई, दिल्ली, महेमूद, बारापुल्ला यासारखे काही दरवाजे अजूनही टिकून आहेत. टाऊन हॉल इमारत मनपाने संवर्धन केली आहे. दौलताबाद येथील देवगिरी किल्ला, १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर, शिवाजी पुराणवस्तुसंग्रहालय, सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालय, सलीम अली सरोवर, खुलताबाद येथील औरंगजेबची कबर, पैठण येथील धरण व नाथ मंदिर अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे औरंगाबाद शहर व जिल्ह्यात आहेत.