शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

अशी असेल गणेश मंडळांसाठी पोलिसांची आचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 17:52 IST

शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचा उद्देश

ठळक मुद्देधर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय वर्गणी सक्तीने गोळा करू नयेविसर्जन मिरवणूक लवकर काढून रात्री १२ वाजेपर्यंत पूर्ण करावी

औरंगाबाद : जातीय सलोखा कायम ठेवून सतत सर्वधर्मसमभाव जोपासणारे हे शहर सामाजिक बांधिलकी सांभाळते. संपूर्ण शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, सर्व जनतेला सुरक्षित व शांततापूर्ण जीवन लाभावे यादृष्टीने पोलीस आयुक्तालयाकडून प्रत्येक गणेश मंडळासाठी गणेशोत्सवासाठी आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. सामाजिक व सार्वजनिक स्वास्थ्य राखण्यास त्याची मदत होईल, असे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी मंगळवारी जाहीर केले आहे. 

अशी असेल आचारसंहिता- धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी आवश्यक, ताळेबंदाबाबत पूर्तता करावी, धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय वर्गणी सक्तीने गोळा करू नये, गणपतीपुढील मंडपाने रहदारीस अडथळा होऊ नये, ना हरकत प्रमाणपत्र हवे.- सजावटीस आग लागू नये, याची दक्षता घ्यावी, इतर धर्मीयांच्या भावना दुखावल्या जातील, अशी सजावट नसावी, प्रखर तेजाचे दिवे टाळावेत, रोषणाईत शॉर्टसर्किट होणार नाही, याची काळजी घ्यावी, पर्यायी प्रकाशाची व्यवस्था ठेवावी- देखाव्याची माहिती संबंधित ठाण्याला कळवावी, उत्सवकाळातील कार्यक्रमांची माहिती पोलिसांना द्यावी, बंदोबस्त देणे सोयीचे होऊ शकते.- लाऊडस्पीकरसाठी ठाण्यातून परवानगी आवश्यकच, बीभत्स गाणी नको, ध्वनिक्षेपण रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत करता येणार नाही, मूर्तीची देखभाल जबाबदारी मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांनी २४ तास करावी. त्यांची नावे प्रत्येक दिवशी कागदावर लिहून ठेवावीत.- गणपती देखावे आक्षेपार्ह असू नयेत, तिकीट शो असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय करमणूक शाखेकडून परवानगी घ्यावी. मिरवणूक देखाव्यात विजेच्या तारांचा संपर्क होणार नाही, याची दक्षता घ्यावी. - मद्यपान, बीभत्स वर्तन करणाऱ्यास पोलिसांच्या ताब्यात द्यावे. करमणुकीच्या कार्यक्रमात संयोजकांनी दोर लावून बंदोबस्त ठेवावा. मंडपात मेणबत्ती, दिवा, अगरबत्ती सुरक्षित असावी. - विसर्जन मिरवणुकीसाठीच्या वाहनाचे आरटीओकडून तपासून प्रमाणपत्र घ्यावे. देखावे पाहणाऱ्यासाठी सुरक्षा असावी. - मंडप व विसर्जन विहिरीजवळ फटाके फोडू नयेत. विसर्जनस्थळी प्रकाशव्यवस्था आहे; परंतु लहान मुलांना जपावे, पाण्यात उतरू देऊ नये. बेवारस वस्तूविषयी पोलिसांना कळवावे. मदतीसाठी स्थानिक पोलीस चौकी, ठाणे, नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. - मूर्तीशेजारी खाद्यपदार्थ ठेवू नयेत. वाहन बंद पडू नये याची दक्षता घ्यावी, वाहनावर मंडळ, अध्यक्ष-सचिवाची नावे लिहावीत, खिसेकापूपासून सावधान, अफवा पसरवू नका.- मिरवणूक अथवा देखावे पाहायला जाताना महिलांनी दागिने परिधान करणे टाळावे, मुलांना एकटे सोडू नका, मंडळाच्या स्वयंसेवक व कार्यकर्त्यांनी मद्य प्राशन करू नये, आरती सावधपणे हाताळावी, महिला-मुलींची छेडछाड होऊ नये, याची दक्षता घ्यावी, आरतीमध्ये अपरिचित व्यक्तीकडून प्रसाद, नैवेद्यासाठी मिठाई, पूजेसाठीची फुले स्वीकारू नयेत. - कार्यकर्ते, स्वयंसेवकांना फोटो पास द्यावेत, विसर्जन मिरवणूक लवकर काढून रात्री १२ वाजेपर्यंत पूर्ण करावी, मिरवणुकीत बैलगाडीचा वापर टाळावा, आगीचा बंब, रुग्णवाहिका, पोलीस वाहने सहजपणे जाऊ शकतील एवढी जागा मंडपाच्या बाजूला ठेवावी. - जुगार व अवैध धंदे, दारू, मटका, संशयास्पद व्यक्ती, समाजकंटकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून नियंत्रण कक्ष व स्थानिक पोलिसांना संपर्क साधवा.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवAurangabadऔरंगाबादCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादPoliceपोलिस