शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

आत्महत्या अडकल्या निकषात

By admin | Published: May 28, 2014 12:39 AM

शिवराज बिचेवार , नांदेड नांदेड जिल्ह्यात जानेवारी ते मे या पाच महिन्याच्या काळात एकूण ३१ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत़

 शिवराज बिचेवार , नांदेड नांदेड जिल्ह्यात जानेवारी ते मे या पाच महिन्याच्या काळात एकूण ३१ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत़ परंतू शासनाच्या आत्महत्याग्रस्तांच्या बाबतीत असलेल्या जाचक नियमांमुळे केवळ १३ शेतकर्‍यांच्या आत्महत्या अनुदानासाठी पात्र ठरल्या आहेत़ फेब्रुवारी ते मार्च महिन्यात अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ६६ हजार २९९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले़ त्यानंतर फेब्रुवारी ते एप्रिल या ३ महिन्यात जिल्ह्यातील २२ शेतकर्‍यांनी आत्महत्या करुन आपले जीवन संपविले़ शासनाच्या आकडेवारीनुसार जानेवारी-५, फेब्रुवारी - ५, मार्च-१२, एप्रिल-५, मे-४ अशा एकूण ३१ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत़ त्यात अनुदानासाठी फक्त १३ शेतकर्‍यांच्या आत्महत्या पात्र ठरल्या असून ९ शेतकर्‍यांच्या आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत़ तर चौकशीसाठी ९ प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत़ पात्र ठरलेल्या १३ शेतकर्‍यांच्या कुटुंंबियांना १० लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे़ आत्महत्येच्या संदर्भात मदतीसाठी शासनाच्या असलेल्या जाचक नियमामुळे पीडित कुटुंबे अक्षरक्ष मेटाकुटीला येत आहेत़ कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्याने अगोदरच दुखात असलेल्या त्यांच्या आप्तांना शासकीय मदतीसाठीही कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात़ त्यासाठी कागदपत्रांची जुळवणी करताना त्यांची आर्थिक पिळवणुकही करण्यात येत असल्याची उदारहणे समोर येत आहेत़ प्रत्यक्षात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना शासनाकडून मदत मिळाली नाही़ असे असताना कर्ता पुरुष गेलेल्या कुटुंबियांना तरी, मदतीचा आधार देवून सांत्वन करण्याची गरज आहे़ याकडे प्रशासन तसेच समाजसेवी संघटनांनी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे़ एखाद्या शेतकर्‍याने आत्महत्या केल्यानंतर मदतीसाठी निश्चित केलेले निकष पूर्ण करताना नातेवाईकांच्या मात्र नाकीनऊ येतात़ बँकेकडून थकित कर्जाचे प्रमाणपत्र, शवविच्छेदन अहवाल आदी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते़ लोहा तालुक्यातील गोलेगाव येथील ४२ वर्षीय संतुका कामाजी गारुळे या शेतकर्‍यांनी १३ मार्च रोजी आत्महत्या केली होती़ ५ एकर मध्ये गहू, हरभरा आवला होता़ बियानांसाठी बँकेचे ९० हजारांचे कर्जही काढले होते़ गारुळे यांच्या आत्महत्येनंतर शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही़ त्यामुळे रोजमजुरी करुन उदरनिर्वाह करावा लागत असल्याची प्रतिक्रिया रेखाबाई गारुळे यांनी दिली़