शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

उन्हाचा ‘शाॅक’! छत्रपती संभाजीनगरात पारा ४१.६ अंशांवर गेल्याने विजेची मागणी वाढली 

By साहेबराव हिवराळे | Published: May 09, 2024 5:56 PM

वीजपुरवठा अद्यापही पूर्णत: सुरळीत झाला नाही

छत्रपती संभाजीनगर : शहराचा पारा ४१.६ अंशांपर्यंत पोहोचला असल्याने कूलर तसेच एसीचा लोड वाढल्याने विजेच्या फीडरवर परिणाम होत आहे. त्यातच गेल्या आठवड्यात सोसाट्याचा वारा अन् पावसाने महावितरणला चांगलाच फटका दिला. हा दुरुस्तीचा खर्च दोन कोटींपर्यंत गेला आहे.

उन्हाचा पारा सातत्याने ४० अंशांच्या पुढे जात असल्याने विजेची मागणी वाढलेली दिसली. सध्या शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने दिवसभर टीव्हीपुढे बसून कार्टून, मालिका तसेच व्हिडीओ गेमकडे मुलांचा कल आहे. त्यातच वीज दिवसभरातून अनेकदा गायब होत असल्याने अनेक कुटुंबे सौर ऊर्जेची वीज वापरत आहेत.

...व्याजासह वसुलीसिडको एन-३, ४, सातारा- देवळाई, एन-७, हडको, सुरेवाडी, मुकुंदवाडी, रामनगर, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, बंबाटनगर यासह बहुतांश वसाहतीत वीज गायब होते. पण, वीजबिल थकले की त्याला व्याज लावून महावितरण वसुली करते.- हेमा पाटील

उन्हाळ्यात तरी वीजपुरवठा खंडित नको...वादळी वाऱ्याच्या फटक्याने अजूनही महावितरणचे काम संपलेले नाही, असे सांगून दुरुस्तीसाठी वीज बंद केली जाते. परंतु, हा उकाडा कुटुंबाला सहन करावा लागतो. उन्हाळ्यात तरी वीजपुरवठा खंडित करू नये.- सुभाष पांडभरे

बिघाड अन् दुरुस्ती...उन्हाळ्यात वाढलेल्या मागणीमुळे वीजपुरवठा अनेकदा खंडित होतो. बिघाड दुरुस्तीसाठी फीडर बंद करावेच लागते. अधिक वेळ बंद झाल्यास जनतेला त्रासही होतो. त्यासाठी कोणते क्षेत्र विजेविना राहील, ते आम्ही जाहीर करतोच. जनतेने सुरळीत सेवेसाठी सहकार्य करावे.- शांतीलाल चौधरी, अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :electricityवीजAurangabadऔरंगाबाद