शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करा

By admin | Published: August 26, 2015 11:56 PM

जालना : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना तात्काळ टँकरने पाणीपुरवठा करण्यासह शेतकऱ्यांचे वीजबील माफ करावे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाने भरावे,

जालना : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना तात्काळ टँकरने पाणीपुरवठा करण्यासह शेतकऱ्यांचे वीजबील माफ करावे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाने भरावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जालना जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मार्गदर्शन केले होते. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करुन आगामी काळात काँग्रेस अधिक आक्रमक होणार असल्याचे संकेत दिले होते. या परिषदेत माजी मंत्री अब्दुल सत्तार, माजी आ. सुरेश जेथलिया यांच्यासह अनेक मान्यवरांनी सरकारच्या कारभारावर टीका केली होती. परिषदेला जवळपास १२ हजार काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. परिषदेनंतर खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. केंद्र व राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळले नसून हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. सरकारने तात्काळ शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करुन मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा, जिल्ह्यात मनरेगाची कामे त्वरित सुरु करावीत, गरज असेल तेथे चारा छावण्या उभाराव्यात, गतवर्षीचे फळबाग विम्याचे पैसे ताबडतोब वाटप करावे, मोसंबी, डाळिंब आदी फळबागांना जीवंत ठेवण्यासाठी हेक्टरी विशेष अनुदान द्यावे, शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. निवेदनावर प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मंत्री अब्दुल सत्तार, प्रदेश सरचिटणीस अरुण मुगदिया, माजी आ. कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, आ. अमर राजूरकर, आ. सुभाष झांबड, माजी आ. कल्याण काळे, माजी आ. सुरेश जेथलिया, एम.एम. शेख, नगराध्यक्ष पार्वताबाई रत्नपारखे, औरंगाबाद सेवा दलाचे अध्यक्ष विलास औताडे, माजी आ. धोंडीराम राठोड, शकुंतला शर्मा, संतोषराव दसपुते, महिला आघाडीच्या अध्यक्षा आयशा मुलानी, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष बदर चाऊस आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.