शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

हयात असतानाच स्वामीनाथन् यांना भारतरत्न मिळायला हवे होते; कन्या मधुरा यांची खंत 

By स. सो. खंडाळकर | Updated: March 7, 2024 14:00 IST

शेतकऱ्यांच्या मालाला खर्चावर आधारित भाव मिळत नाही, हे वास्तव आहे.

छत्रपती संभाजीनगर : गेली साठ वर्षे डॉ. स्वामीनाथन यांनी या देशातील शेतकऱ्यांसाठी खूप काही केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ते हयात असतानाच त्यांना भारतरत्न हा मानाचा पुरस्कार मिळायला हवा होता, अशी भावना त्यांच्या कन्या डॉ. मधुरा स्वामीनाथन यांनी व्यक्त केली आहे.

बुधवारी सायंकाळी त्या सीटू भवनात पत्रकारांशी बोलत होत्या. डॉ. मधुरा स्वामीनाथन या राष्ट्रीय सांख्यिकी संस्था बंगळूर येथे अर्थशास्त्रीय मूल्यमापन विभागप्रमुख आहेत. माजलगाव येथे किसान सभेच्या वतीने आयोजित किसान मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवारी त्या रवाना होतील.

त्यांनी सांगितले की, या देशातील ४० टक्के छोटे शेतकरी दारिद्र्य रेषेखाली आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला खर्चावर आधारित भाव मिळत नाही, हे वास्तव आहे. खरे तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान हमीभाव मिळायला पाहिजे. अनेक शेतकऱ्यांना एमएसपीच माहीत नाही. 

भाजप सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत मधुरा म्हणाल्या, सरकार बदलल्याने खूप काही फरक पडू शकेल. शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकार थेट मदत पाठवते, याकडे लक्ष वेधताच त्यांनी सागितले की, जी रक्कम पाठवली जाते, ती तुटपुंजी आहे.

आगामी काळात शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करू शकाल काय, असे विचारता त्या म्हणाल्या, मुळीच नाही. पण या आंदोलनांना मदत करण्याची माझी भूमिका राहील. या पत्रपरिषदेस माकपचे सचिव कॉ. भगवान भोजने व सेल्वन डॅनियल व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद