शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
4
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
6
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
7
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
8
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
9
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
10
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
11
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
12
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
13
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
14
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
15
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
16
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
18
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
19
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
20
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!

वेळीच काळजी घ्या; मधुमेहाला वयच नाही; लहान मुले, तरुण, ज्येष्ठांनाही गाठतोय

By संतोष हिरेमठ | Updated: November 14, 2024 14:00 IST

जागतिक मधुमेह दिन विशेष;  घाटी रुग्णालयात ४५ ते ६० वर्षे वय असलेले ६० टक्के मधुमेह रुग्ण

छत्रपती संभाजीनगर : ठरावीक वयानंतरच मधुमेह होतो, असे म्हणणे चुकीचे ठरत आहे. कारण लहान मुले, तरुण आणि ज्येष्ठ अशा सर्वांनाच मधुमेह गाठत आहे. प्रत्येकाला हा आजार होण्याचे कारण वेगवेगळे आहे. त्यातून अनेक दुष्परिणाम होतात. मात्र, योग्य काळजी घेतली तर मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो.

घाटीतील मेडिसिन विभागप्रमुख डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य म्हणाल्या, मधुमेहाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आता दुपारचीही ओपीडी सुरू झाली आहे. ओपीडीत मधुमेह रुग्णांची तपासणी केली जाते. घाटीत येणाऱ्या रुग्णांमध्ये ४५ ते ६० वर्षे वय असलेले ६० टक्के रुग्ण असतात. तर ३० ते ४५ वर्षे वयोगटाचे १५ टक्के रुग्ण असतात. मधुमेह असलेल्या बालकांवर बालरोग विभागात उपचार होतात.

तरुण वयातच गाठतोय मधुमेहएका अभ्यासात छत्रपती संभाजीनगरसह देशभरात झालेल्या ३५ वर्षांखालील २ लाख २५ हजार ९५५ व्यक्तींच्या तपासणी मोहिमेत मधुमेहाचे प्रमाण तपासले. यातून ३५ वर्षांखालील, ३० वर्षांखालील आणि २५ वर्षांखालील व्यक्तींमध्ये मधुमेहाचे प्रमाण अनुक्रमे १७.९ टक्के, १३.३ टक्के आणि ९.८ टक्के आढळले. मधुमेहाची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्यांमध्ये याच वयोगटात मधुमेहाचे प्रमाण अनुक्रमे ४०.१ टक्के, ३१.८ टक्के आणि २६.४ टक्के आढळले. हा अभ्यास तरुणांमध्ये मधुमेहाचे प्रमाण अत्यंत जास्त असल्याचे दर्शवितो. विशेषत: मधुमेहाची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींमध्ये वयाच्या १८ व्या वर्षापासूनच मधुमेहाची तपासणी करणे आवश्यक ठरते.- डाॅ. मयुरा काळे, मधुमेहतज्ज्ञ

‘स्लो पाॅयझन’सारखे दुष्परिणाममधुमेह हा ‘स्लो पाॅयझन’सारखे शरीरावर दुष्परिणाम करतो. पुन्हा पुन्हा त्वचेचे फंगल व विविध इन्फेक्शन होणे, लघवीचे इन्फेक्शन होणे, हार्ट अटॅक, किडनी खराब होणे, लकवा, डोळ्याच्या पडद्यावर, पायाच्या नसांवर दुष्परिणाम होतो. त्यामुळे शुगर नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.- डाॅ. नीलेश लोमटे, मधुमेह व हार्मोन्सतज्ज्ञ

महिन्याला १५ ते २० नवीन बालमधुमेहीदर महिन्याला १५ ते २० नवीन बालमधुमेही येत आहेत. आजघडीला नोंद असलेल्या बालमधुमेहींची संख्या ही १,३५० झाली आहे. २५ वर्षांखालील तरुणांचाही समावेश आहे. ९० टक्के अंधत्व असलेली १५ वर्षीय मुलगी मधुमेहाच्या सर्व परिस्थितीवर मात करून पुढे जात आहे. बारावीत तिने ९४ टक्के मिळविले.- डाॅ. अर्चना सारडा, बालमधुमेहतज्ज्ञ

वृद्धांची काळजी घ्यावीमधुमेह असलेल्यांचे हिमोग्लोबीन ‘ए१सी’ या चाचणीचे प्रमाण ६ पेक्षा कमी असणे योग्य समजले जाते. परंतु वृद्धांमध्ये मधुमेहाच्या उपचारामुळे हायपोग्लॅसेमिया, रक्तातील साखर कमी होऊन त्याचे दुष्परिणाम होणे, हे अधिक धोकादायक असते. यासाठी अशा व्यक्तींचे हिमोग्लोबिन ‘ए१सी’ हे ७ ते ८ च्या मध्ये असले तरी अधिक कमी करण्याचे प्रयत्न करू नये.- डाॅ. मंगला बोरकर, प्राध्यापक, वार्धक्यशास्त्र विभाग, घाटी

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरdiabetesमधुमेह