शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनाम्यावर राजीनामे! थोड्याच वेळात नायाब सिंह सैनी राजीनामा देणार, हरियाणा विधानसभा भंग करण्याची शक्यता
2
विनेश फोगाटांविरोधात AAP चा उमेदवार ठरला! केजरीवालांनी कुणाला दिले तिकीट?
3
Supriya Sule : अजित पवारांविरोधात कुणाला उमेदवारी देणार? सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात दिलं उत्तर
4
सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला ब्रेक; शक्तीपीठनंतर आता भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गाचं काम थांबवलं
5
थलपती विजयचा GOAT सिनेमा का फ्लॉप झाला? दिग्दर्शक म्हणाले- "चेन्नई सुपर किंग्जमुळे..."
6
ओला आता तरी सुधारणार का? शोरुम बंद करता करता ते जाळण्यापर्यंत वेळ आली, सर्व्हिसच नाही
7
"अजून २० जागा मिळाल्या असत्या तर हे सगळे..."; मल्लिकार्जुन खरगेंनी भाजपवर साधला निशाणा
8
Ola : ...अन् त्याने 'ओला शोरूम' दिले पेटवून, गाड्या जळून खाक
9
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN: "तो' खूप टॅलेंटेड आहे, पण विराट-रोहितच्या सावलीखाली लपला जातो"; स्टार समालोचकाचं मत
10
iPhone Eye Tracking Feature: जबरदस्त! आता iPhone तुमच्या डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार;नवीन फिचर आले
11
मुंबई इंडियन्स रोहितला नारळ देणार? आकाश चोप्रा म्हणतो; तो लिलावातही नाही दिसणार!
12
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; नफावसूलीमुळे सेन्सेक्स ४०० आणि निफ्टी १२२ अंकांनी घसरुन बंद
13
रक्ताचे डाग, फाटलेले कपडे; पालघरमध्ये 10 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार
14
Sandip Ghosh : "तो बलात्कारी, खुनी, चोर... त्याला फाशी द्या"; संदीप घोषला पाहताच वकिलांची जोरदार घोषणाबाजी
15
विम्यासाठी तक्रार घ्या म्हटले म्हणून संकेत बावनकुळे अडकला? सुषमा अंधारेंचा धक्कादायक दावा
16
आता २० किमीपर्यंत टोल माफ, नवा नियम; टोल नाक्यावरही पैसे कापणार नाहीत
17
शिमल्यात तणाव वाढला, संजौली मशिदीकडे निघालेल्या आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, अनेक जखमी
18
टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन तयार करणाऱ्या बड्या कंपनीत सणासुदीपूर्वी कर्मचारी कपात, २०० जणांना काढणार
19
"राहुल गांधी हे परकीय मानसिकतेलाच धार्जिणे आहेत", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
20
टोल नाक्यावर १०० मीटरपेक्षा मोठी रांग, १० सेकंड वेटिंगचा खरोखरच नियम होता? NHAI कडे लाखो तक्रारी...

महाराष्ट्रात इतक्या नद्या, सरकार पिण्याचे पाणी देऊ शकत नाही; केसीआर यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 8:39 PM

भारताला परिवर्तनाची गरज; भारत बदलला तरच विकास होईल.

छत्रपती संभाजीनगर: दाआज तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा बीआरएसचे सर्वेसर्वा के.चंद्रशेखर राव यांनी शहरात जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी देशातील पाण्याची समस्या आणि शेतकरी प्रश्नावरुन आपले व्हिजन मांडले. यावेळी त्यांनी देशाला परिवर्तनाची गरज असल्याचे म्हटले. तसेच, शेतकऱ्यांना पक्षासोबत येण्याचे आवाहनही केले.

यावेळी ते म्हणाले, आपला भारत देश खूप महान आहे, पण आज आमच्या मनात एक प्रश्न निर्माण झालाय. आज आपल्या देशाचे लक्ष्य काय आहे? की भारत आपले लक्ष्य हरवून बसलाय? लक्ष्य नसेल तर हा देश कुठे जाणार? देशात काय सुरू आहे? नव्या जिद्दीने पुढे जायचे आहे की, असेच पडून राहायचे आहे? भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. मला माहिती मिळाली की, संभाजीनगर शहरात आठ दिवसातून एकदा पाणी येते. माझ्यासोबत अकोल्यातील सहकारी आहे, तिकडेही अशीच अवस्था आहे. महाराष्ट्रात इतक्या नद्या आहेत, पण आजही पाण्याची भीषण परिस्थिती आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई असलेल्या राज्यात पिण्याचे पाणी देऊ शकत नाही? 

ते पुढे म्हणतात, जनता सोन्याची वीट, चंद्र-तारे मागत नाहीत, फक्त पिण्याचे पाणी मागत आहेत. इतकी सरकारं बदलली, इतका गोंधळ झाला, पण पिण्याचे पाणी देऊ शकत नाही. आज बेरोजगारी वाढत आहे. लाखो उद्योग बंद होत आहेत. कामगार रस्त्यावर आले आहेत. देशात जातीवाद-धर्मवाद-लिंगभेद सुरू आहे. दररोज अशाच घटना आपण पाहत आहोत. श्रीमंत अजून श्रीमंत होत आहेत. गरीब अजून गरीब होत आहे. हे कडू सत्य आहे. आपल्या डोळ्यांसमोर हे घडत आहे. हे असचं चालू द्यायचे आहे की, याचा काही तोडगा काढायचा आहे? 

आता परिवर्तनाची गरज आहे. भारताला बदलाची गरज आहे. जोपर्यंत आपण परिवर्तन करणार नाही, तोपर्यंत आपले नशीब बदलणार नाही. या देशात एक पक्ष गेला दुसरा आला, पक्ष बदलला म्हणजे बदल झाला नाही. या महाराष्ट्रात रोज 6-7 शेतकरी आत्महत्या करतात. पण, आपले पंतप्रधान आफ्रिकेतून चित्ते आणतात आणि दाखवतात. याला काय अर्थ आहे? मी शेतकऱ्यांना विनंती करतो की, भारताला बदलायचे असेल तर तुमची साथ लागेल. बदलाशिवाय भारताचा विकास होणार नाही. आपली समस्या आपल्यालाच सोडवावी लागेल. कुणी अमेरिका-रशियातून येणार नाही. लवकर जागे झालो, तरच आपला सुधार होईल, असेही केसीआर यावेळी म्हणाले.

आपल्या भारतात 41 लाख हेक्टर कृषी क्षेत्र आहे. या शेतीला जितके पाणी लागते, त्यापेक्षा डबल पाणी उपलब्ध आहे. पण, आपल्या देशातील नेत्यांची इच्छाशक्ती नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. याला बदलावे लागेल. नेहरुंच्या काळात काही योजना व्हायच्या. पण, त्यानंतर जेवढी सरकारे आली, त्यांनी काहीच कामे केली नाही. देशात जे पाणी आहे, ते समुद्रात वाहून जात आहे. सरकार तमाशा पाहत आहे. पाण्यासाठी चांगली धरणे बांधायला हवी, वाहत्या पाण्याला थांबवावे लागेल. पाणी असूनही त्याचा योग्य वापर होत नाही. पाण्याची पॉलिसी बदलावी लागेल, त्याशिवाय आपण तहाणलेले राहू. 

पाणी कोणत्या कंपनीत बनवू शकत नाही. पाणी देवाची देणं आहे. याचा योग्य वापर व्हायला हवा. याचा वापर अनेक देशांनी योग्यरित्या केला आहे. पण, आपल्या देशात पाण्याचा योग्य वापर होत नाही. पाण्याची पॉलिसी बदलायला हवी. महाराष्ट्रात बीआरएस सरकार बनवा, प्रत्येक घरात नळाचे पाणी पोहचवू. आज तेलंगणात दररोज पाणी मिळत आहे. श्रीमंत लोक जे पाणी पितात, तेच गरीबांनाही आम्ही देतो. आमचे सरकार आल्यावर आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला पाणी देऊ, हे माझे वचन आहे. पाण्यासाठी रडायचे नाही, लढायचे. शेतकऱ्यांना एकत्र या आणि सोबत येऊन परिस्थिती बदलुया. आपल्यालाच आपली मदत करावी लागेल, असेही ते यावेळी म्हणाले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावBJPभाजपाFarmerशेतकरी