शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

औरंगाबाद विमानतळावर टर्मिनल तयार, पण आंतरराष्ट्रीय कार्गो सेवेची प्रतीक्षाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 12:27 IST

सेवा सुरू होण्यासाठी अडथळे दूर होईना; जगभरात माल पाठविण्यासाठी मुंबई, दिल्लीवर मदार

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : जगभरातील अनेक कंपन्यांच्या वाहनांत औरंगाबादेतील औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांत तयार झालेला एक तरी स्पेअर पार्ट आहे. याबरोबर इतर अनेक उत्पादनांची परदेशांत निर्यात होते. मात्र ही उत्पादने परदेशांत मुंबई, दिल्ली मार्गाने पाठविण्याची वेळ ओढवत आहे. कारण चिकलठाणा अंतरराष्ट्रीय विमानतळावर अंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू होण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

औरंगाबाद शहर आणि परिसरातील औद्योगिक वसाहतींमध्ये ऑटोमोबाईल्स, कृषी, फार्मासह विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्या आहेत. वर्षभरात उत्पादनांतून सुमारे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. येथील उत्पादनांना जगभरातून मागणी आहे. चिकलठाणा विमानतळावरून उद्योग, शेती व्यवसायातील माल आयात-निर्यात करण्यासाठी एअर कार्गो सेवा सुरू करण्यासाठी विमानतळावरील जुन्या टर्मिनल इमारतीचे कार्गो कॉम्प्लेक्समध्ये रुपांतर करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच विमानतळावर ड्रग इन्स्पेक्टरची नियुक्ती झाली आहे. विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे म्हणाले की, ही नियुक्ती आंतरराष्ट्रीय कार्गो सेवेसाठीच झाली आहे.

किमान एक हजार ट्रक रवानाऔरंगाबादेतील विविध उत्पादने दररोज किमान एक हजार ते १५०० ट्रकमधून देशभरातील विविध शहरांत जातात. ८० देशांमध्ये औद्योगिक मालाची निर्यात होते. यात वाहन, वाहनांचे सुटे भाग, औषधी, साॅफ्टवेअरसह इतर उत्पादनांचा समावेश आहे.

तीन हजार टन माल निर्यातचिकलठाणा विमानतळावरून सध्या मुंबईमार्गे दरवर्षी दीड हजार टन माल निर्यात केला जातो. विमानतळावर आंतराष्ट्रीय एअर कार्गो सेवा सुरू झाल्यावर दरवर्षी जवळपास तीन हजार टन माल निर्यात होईल, अशी अपेक्षा आहे.

वर्ष २०२१ मध्ये ७०६.२ टन मालाची वाहतूकऔरंगाबाद विमानतळावरून प्रवासी विमानातून सध्या देशांतर्गत कार्गो माल पाठविला जात आहे. वर्ष २०२१ मध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत औरंगाबादहून दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद, चेन्नईला तब्बल ७०६.२ टन कार्गो पाठविण्यात आल्या.

औषधी, फूड, कृषी उत्पनांची निर्यात शक्यऔषधी, फूड, भाजीपाला, फुले यांची आंतरराष्ट्रीय कार्गोद्वारे निर्यात होईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कृषी उत्पनांच्या निर्यातीसाठी योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केला पाहिजे. विमानांची संख्या वाढल्यानंतर कार्गो सेवा वाढीला मदत होईल.-मुकुंद कुलकर्णी, उद्योजक

औरंगाबादेतील उद्योग कंपन्या-२५००फार्म कंपनी- ६०

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळMumbaiमुंबई