शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भयंकर! पैशाच्या देवाणघेवाणीवरून एकास अॅसिड टाकून जाळले, दुसऱ्यावर कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 13:42 IST

खुलताबाद पोलीसांनी तीन आरोपींना केली अटक; रात्री छत्रपती संभाजीनगर रोडवरील घटना

खुलताबाद: पैशाच्या देवाणघेवाणीवरून तीन जणांनी दोन जणांवर हल्ला केला चाकू व कोयत्याने हल्ला करीत एका जणास अॅसिड टाकून जाळून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तर अन्य एका जखमीवर घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहे. खुलताबाद पोलीसांनी रात्रीच तिन्ही आरोपींना अटक करून गजाआड केले आहे. रात्री साडेअकरा वाजता ही घटना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नंद्राबादनजीक घडली. 

याबाबत या हल्ल्यातील जखमी असलेला आनंद बाबासाहेब वारे ( रा. फुलेनगर, उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अक्की उर्फ आकाश कैलास रणधीर ( ३६, रा वेरूळ ता खुलताबाद,  हमु सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर) हा मंगळवारी सायंकाळी वेरूळला जायच म्हणून मोटारसायलवर आला. त्याच्यासोबत वेरूळला मयूर पाटणी याच्या लॉजवर गेलो. मात्र, मयूर पाटणी याने नंद्राबादनजीक असलेल्या परमीट बारवर येण्यास सांगितले. ठेतहे त्याच्यासोबत नितीन ठाकरे देखील होता. येथे सर्वांनी दारू पिली. तेवढ्यात  रात्री ११:३० वाजता शेख नावेद त्या ठिकाणी आला. त्यानंतर मयूर पाटणीने आकाशला ७ हजार रूपये देण्यासाठी बाहेर काढले. मात्र, आकाशने आणखी १० ते १२ हजार रूपये जास्तीचे मागत पैसे घेण्यास नकार दिला. त्यावर मयूर पाटणी याने आकाश रणधीर व आनंद वारे यास हॉटेलच्या पाठीमागे घेवून गेले. अचानक मयूरने आनंद वारे याचे तोंड दाबून पाठीवर, पोटावर वार केले. त्यानंतर शेख नावेदने चाकूने आकाशच्या पोटावर व डोक्यावर वार केले. 

दरम्यान, हल्ला होत असताना मयूर पाटणीच्या हातातून कोयता हिसकावून जखमी अवस्थेत आनंद वारे तेथून फरार झाला. मित्राच्या मदतीने आनंद छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल झाला. त्याच वेळी आकाश रणधीर यास ही उपचारासाठी रूग्णवाहिकेतून आणले होते. आकाश रणधीर याच्या अंगावर ,तोंडावर ,डोळ्यावर अँसिड टाकले असल्याने तो संपूर्ण जळाला होता. येथे उपचार सुरू असताना आकाशचा मृत्यू झाला. 

माहिती मिळताच खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, सपोनि दिनकर गोरे यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली. तसेच तत्काळ मयूर पाटणी, नितीन ठाकरे , शेख नावेद ( सर्व रा वेरूळ ता. खुलताबाद) यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपविभागीय अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड हे करत आहे. दरम्यान, आकाश रणधीर हा वेरूळ गावातील काही व्यापाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून खंडणीसाठी त्रास देत असल्याची गावात चर्चा आहे. सततच्या त्रासाला कंटाळूनच आरोपींनी हे कृत्य केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी