शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

भयंकर! पैशाच्या देवाणघेवाणीवरून एकास अॅसिड टाकून जाळले, दुसऱ्यावर कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 1:42 PM

खुलताबाद पोलीसांनी तीन आरोपींना केली अटक; रात्री छत्रपती संभाजीनगर रोडवरील घटना

खुलताबाद: पैशाच्या देवाणघेवाणीवरून तीन जणांनी दोन जणांवर हल्ला केला चाकू व कोयत्याने हल्ला करीत एका जणास अॅसिड टाकून जाळून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तर अन्य एका जखमीवर घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहे. खुलताबाद पोलीसांनी रात्रीच तिन्ही आरोपींना अटक करून गजाआड केले आहे. रात्री साडेअकरा वाजता ही घटना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नंद्राबादनजीक घडली. 

याबाबत या हल्ल्यातील जखमी असलेला आनंद बाबासाहेब वारे ( रा. फुलेनगर, उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अक्की उर्फ आकाश कैलास रणधीर ( ३६, रा वेरूळ ता खुलताबाद,  हमु सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर) हा मंगळवारी सायंकाळी वेरूळला जायच म्हणून मोटारसायलवर आला. त्याच्यासोबत वेरूळला मयूर पाटणी याच्या लॉजवर गेलो. मात्र, मयूर पाटणी याने नंद्राबादनजीक असलेल्या परमीट बारवर येण्यास सांगितले. ठेतहे त्याच्यासोबत नितीन ठाकरे देखील होता. येथे सर्वांनी दारू पिली. तेवढ्यात  रात्री ११:३० वाजता शेख नावेद त्या ठिकाणी आला. त्यानंतर मयूर पाटणीने आकाशला ७ हजार रूपये देण्यासाठी बाहेर काढले. मात्र, आकाशने आणखी १० ते १२ हजार रूपये जास्तीचे मागत पैसे घेण्यास नकार दिला. त्यावर मयूर पाटणी याने आकाश रणधीर व आनंद वारे यास हॉटेलच्या पाठीमागे घेवून गेले. अचानक मयूरने आनंद वारे याचे तोंड दाबून पाठीवर, पोटावर वार केले. त्यानंतर शेख नावेदने चाकूने आकाशच्या पोटावर व डोक्यावर वार केले. 

दरम्यान, हल्ला होत असताना मयूर पाटणीच्या हातातून कोयता हिसकावून जखमी अवस्थेत आनंद वारे तेथून फरार झाला. मित्राच्या मदतीने आनंद छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल झाला. त्याच वेळी आकाश रणधीर यास ही उपचारासाठी रूग्णवाहिकेतून आणले होते. आकाश रणधीर याच्या अंगावर ,तोंडावर ,डोळ्यावर अँसिड टाकले असल्याने तो संपूर्ण जळाला होता. येथे उपचार सुरू असताना आकाशचा मृत्यू झाला. 

माहिती मिळताच खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, सपोनि दिनकर गोरे यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली. तसेच तत्काळ मयूर पाटणी, नितीन ठाकरे , शेख नावेद ( सर्व रा वेरूळ ता. खुलताबाद) यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपविभागीय अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड हे करत आहे. दरम्यान, आकाश रणधीर हा वेरूळ गावातील काही व्यापाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून खंडणीसाठी त्रास देत असल्याची गावात चर्चा आहे. सततच्या त्रासाला कंटाळूनच आरोपींनी हे कृत्य केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी