शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

औट्रम घाटातील योग्य पर्यायाची निवड ‘एनएचएआय’चे दिल्लीतील मुख्य कार्यालय करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 11:22 IST

सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागार समितीने सुचविले तीन पर्याय

छत्रपती संभाजीनगर : कन्नड ते चाळीसगाव दरम्यानच्या औट्रम घाटातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने सविस्तर प्रकल्प अहवाल सल्लागार समितीने सुचविलेल्या तीन पर्यायी मार्गापैकी योग्य पर्यायाची निवड ‘एनएचएआय’च्या दिल्ली येथील मुख्य कार्यालयातर्फे करण्यात येणार असल्याचे निवेदन गुरुवारी (दि.१८) खंडपीठात करण्यात आले.

समितीतर्फे प्राधिकरणाकडे ३० मार्च २०२४ रोजी ‘फिजिबिलिटी’ अहवाल सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या जनहित याचिकेवर २० ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. पार्टी इन पर्सन याचिकाकर्ते ॲड. ज्ञानेश्वर बागुल यांनी वाहतूक कोंडीसंबंधी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी खंडपीठात सुरू आहे. संबंधित मार्गाला पर्याय सुचविण्यासंबंधी निवृत्त न्या. सुनील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. समितीने मार्गाची पाहणी केली आहे. ॲड. बागुल यांनी महामार्ग प्राधिकरणाने १० वर्षांत काहीच केले नसल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. ॲम्बर्ग सल्लागार समिती यापूर्वी नेमण्यात आली होती. संबंधित सल्लागार कंपनीने अहवाल द्यायला ३ वर्षे लावले होते. खंडपीठाच्या आदेशामुळे यावेळी ६ महिन्यांत अहवाल प्राप्त झाला आहे. प्रत्येक वेळी प्रकरण थंडबस्त्यात टाकण्यात येते. याचिकेवर दरमहा सुनावणी ठेवल्यास प्रकल्पाची प्रगती कळेल असेही ॲड. बागुल यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.

एनएचएआयच्या वतीने ॲड. सुहास उरगुंडे यांनी युक्तिवाद केला की, सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागार समितीने सुचविलेल्या तीन पर्यायांचा अहवाल प्रथम एनएचएआयच्या नागपूर येथील कार्यालयाला पाठवण्यात आला आहे. नागपूर कार्यालय एनएचएआयच्या नवी दिल्ली येथील मुख्य कार्यालयाकडे अहवाल पाठवेल आणि संबंधित कार्यालय जमीन अधिग्रहण समितीकडे पडताळणीसाठी पाठवेल ,असे ॲड. उरगुंडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ