शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

शिंदे-फडणवीस सरकारने दिलेली स्थगिती खंडपीठाने उठविली; मंजूर विकासकामे करता येणार

By प्रभुदास पाटोळे | Updated: March 3, 2023 21:12 IST

जालना, अंबड, घनसावंगी आणि वसमत तालुक्यातील विकासकामे सुरू करण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षातील अर्थसंकल्पात जालना, अंबड, घनसावंगी आणि वसमत तालुक्यातील मंजूर केलेली, प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता दिलेली व निविदा प्रक्रियेच्या स्तरावरील कामांना शिंदे - फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील व न्या. संतोष चपळगावकर यांनी शुक्रवारी (दि. ३) स्थगिती उठविली आणि स्थगित केलेली विकासकामे सुरू करण्याचे आदेश दिले. सदरील आदेश हे संपूर्ण राज्यास लागू नसून, केवळ या रिट याचिकेमध्ये आव्हानित केलेल्या कामांपुरतेच लागू असल्याचे ॲड. संभाजी टोपे यांनी सांगितले.

वसमतचे आमदार राजू नवघरे, जालना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश टोपे, पूजा कल्याण सपाटे आदींनी ॲड. संभाजी टोपे यांच्यामार्फत याचिका दाखल करून महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या निधीनुसार कामे व्हावीत, अशी विनंती केली होती. ती खंडपीठाने मंजूर केली आहे. राज्यात शिंदे - फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या काही कामांना स्थगिती दिली होती. निविदा पूर्ण होऊन कार्यारंभ आदेश दिलेल्या विकासकामांना स्थगित करण्यात येऊ नये, असे खंडपीठाने यापूर्वीच्या सुनावणीवेळी बजावले होते. त्यानंतर संबंधित कामांचा शासन स्तरावर आढावा घेतला जात आहे, असे निवेदन शासनाकडून करण्यात आले होते.

खंडपीठात ५ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीवेळी बऱ्याचशा कामांवरील स्थगिती उठवण्यात आल्याचे शासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, याचिकाकर्त्यांचे वकील संभाजी टोपे यांनी स्थगिती उठवण्यात आलेली कामे केवळ सत्ताधारी पक्षातील आमदारांची असून, विरोधी पक्षातील लाेकप्रतिनिधींच्या कामांवरील स्थगिती कायम असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. सुनावणीच्या वेळी त्यांनी विविध न्याय निवाड्यांचेसुद्धा संदर्भ दिले.

विकासकामांच्या स्थगितीला घटनेच्या धारा २०४ची बाधाॲड. टोपे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार अर्थमंत्री असताना दोन्ही सभागृहांनी आणि राज्यपालांनी याचिकेत दर्शविलेली विकासकामे मंजूर केली होती. अशा प्रकारे मंजूर केलेली कामे राज्य घटनेच्या धारा २०४ नुसार स्थगित करता येत नाहीत. शासन बदलल्यानंतर शिंदे सरकारने कुठलीही प्रक्रिया पूर्ण न करता मंजूर झालेली कामे सचिवांच्या स्वाक्षरीने स्थगित केली. शासनाच्या कामाच्या नियमानुसार (बिजनेस रुल्स) मोठ्या निर्णयासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक असते, याचे पालन झाले नाही.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठCourtन्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे