शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
5
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
6
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
7
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
8
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
9
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
10
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
11
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
12
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
13
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
14
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
15
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
16
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
17
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
18
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
19
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
20
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

पती-पत्नीचे वाद सोडवणारा पोलिसांचा ‘भरोसा सेल’च पडला एकाकी

By सुमित डोळे | Published: August 03, 2024 2:30 PM

संवेदनशील विभागाचा कारभार अवघ्या ३ कर्मचाऱ्यांवर; ४ वाजताच बंद, नेहमी वर्दळ राहणाऱ्या कार्यालयात आता स्मशान शांतता

छत्रपती संभाजीनगर : पती-पत्नीचे वाद सोडवून त्यांना पुन्हा गुण्यागोविंदाने एकत्र आणण्याची जबाबदारी असलेला ‘भरोसा सेल’चा आता एकाकी पडला आहे. एकेकाळी सर्वाधिक वर्दळ राहणाऱ्या या कार्यालयात आता स्मशान शांतता पाहायला मिळत आहे. अवघ्या ३ कर्मचाऱ्यांवर चालणारा या भरोसा सेलचा आता ‘भरोसा’च उरला नसण्याची वेळ तक्रारदारांवर आली आहे.

कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळीसारखी प्रकरणे सोडवण्यासाठी २०१७ मध्ये पहिल्यांदा राज्य सरकारने भरोसा सेल संकल्पनेची घोषणा केली होती. त्यानंतर प्रत्येक शहर व जिल्हास्तरावर पोलिस आयुक्त व अधीक्षक कार्यालयात हा सेल सुरू करण्यात आला. त्याला पोलिस निरीक्षक पदाचा अधिकारी प्रभारी म्हणून नेणे बंधनकारक असून स्वतंत्र दालन, कर्मचारी व समुपदेशकांची नियुक्ती करण्याचे आदेश आहेत. किरकोळ कारणातूनही पती-पत्नीमध्ये घटस्फोट, विभक्त होण्यासह एकमेकांना गंभीर मारहाण करण्यापर्यंत वाद पोहोचतात. समुपदेशनानंतरही समाधान न झाल्यास अखेर प्रकरण न्यायालय किंवा पोलिस ठाण्यांकडे वर्ग करण्यात येते. वकील, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्त्यांसह पोलिस अधिकारी यात समुपदेशन करुन दाम्पत्यांमध्ये समेट घडवण्यासाठी प्रयत्न करतात.

कौटुंबिक कलहांत वाढचार वर्षांमध्ये कौटुंबिक कलहांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. २०२१मध्ये कौटुंबिक वादाच्या २,०६७ तक्रारींपैकी केवळ ४४१ प्रकरणांत समझोत्यासाठी पोलिसांना यश आले, तर २०२४च्या चार महिन्यांमध्येच शहरात ५४६ पती-पत्नीचे वाद पोलिसांपर्यंत पोहोचले.

वर्षे - तक्रारी -समझोता२०२१ -२०६७ -४४१२०२२ - २२२६ -५१०२०२३ -१८७३ -३८३२०२४ -५४६ २०९

वर्षे -कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे२०२० -२०६२०२१ -२८८२०२२ -२७३२०२३ -२४९

दुपारी ३ला विभाग बंद-सिल्लेखाना परिसरात शहर पोलिसांच्या ‘भरोसा सेल’साठी मनपाच्या इमारतीत स्वतंत्र मजला देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत स्वतंत्र निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली ८ कर्मचारी व समुपदेशक येथे कार्यरत होते.-गेल्या काही दिवसांपासून मात्र केवळ २ ते ३ कर्मचारीच कार्यरत आहेत.-सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणारा विभाग आता दुपारी ३ वाजताच बंद होतो, हे विशेष.

पोलिस भरती, सेवानिवृत्ती तर बदली-गुरुवारी दुपारी २:३० वाजता विभागाची पाहणी केली असता दोन समुपदेशक महिला तर एक पोलिस कर्मचारी विभागात होते. बाहेर तक्रारदार प्रतीक्षेत बसले होते. दिवसाला किमान २० तक्रारदार असतात. त्यांची तक्रार ऐकून घेण्यासाठी देखील तेथे कोणी उपस्थित नसते.-यातील एक कर्मचारी नुकतेच सेवानिवृत्त झाले. एका कर्मचाऱ्याची बदली झाली तर उर्वरित सर्व कर्मचारी पोलिस भरतीत व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. तक्रारदारांना मात्र पोलिस विभागाच्या या अती ‘व्यस्ततेचा’ मनस्ताप सहन करावा लागत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद