शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
2
"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले
3
आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या,अन्यथा आगामी निवडणुकीत सरकारला पश्चाताप होईल: मनोज जरांगे
4
धक्कादायक! टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव, पगार कापण्याची धमकी; मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल
5
"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत
6
पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
7
स्वत:शीच लग्न करणाऱ्या जगप्रसिद्ध रिलस्टारने संपविले आयुष्य; चिठ्ठी सापडली
8
पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याची तयारी; ६ महिन्यांत 'या' शेअरनं दुप्पट केला पैसा, तुमच्याकडे आहे का?
9
पितृपक्ष: सर्वपित्री अमावास्येला ‘असे’ करा श्राद्ध; पूर्वज होतील प्रसन्न, समाधानाने तृप्त!
10
दुसऱ्या लग्नातही सुख नाही, नव्या नवरीनं उचललं टोकाचं पाऊल; पती फोनवर असं काय बोलला?
11
सुपर कॅच! सिराज अगदी स्प्रिंगसारखा वाकला; शेवटच्या टप्प्यात शाकिबचा 'करेक्ट कार्यक्रम'
12
फिट राहा! २ वेळा भात खाल्ल्याने वजन वाढतं?; दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात खावा, जाणून घ्या
13
IND vs BAN : 'हिटमॅन' रोहित झाला 'सुपरमॅन'; हवेत उडी मारुन एका हातात पकडला कॅच (VIDEO)
14
वर्षाताई बाहेर जायला हव्या होत्या! पॅडीच्या एक्झिटनंतर प्रेक्षक नाराज, म्हणाले- "बिग बॉस स्वत:च्या मनाने..."
15
SBI ची सुपरहिट स्कीम : एकदा करा डिपॉझिट, दर महिन्याला होईल कमाई; पाहा संपूर्ण डिटेल्स
16
नवरात्रोत्सव: १० राशींना नवदुर्गेचे वरदान, अकल्पनीय लाभ; धनलक्ष्मीची अपार कृपा, शुभच होईल!
17
लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं
18
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
19
पाकिस्तानला मोठा झटका! ६ मंत्रालयांना टाळे, दीड लाख नोकऱ्या गेल्या; आयएमएफकडून कर्जासाठी लोटांगण
20
Nepal Flood : पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता

सत्ताधारी-विरोधकांची झुंज ही नौटंकीची; प्रकाश आंबेडकर यांची महायुती-आघाडीवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 7:49 PM

आंबेडकर यांनी मुस्लीम समाजाला इशारा दिला की, एका समाजावर निवडणुका जिंकता येत नाहीत. सर्वसमावेशक मतांवरच निवडणुका जिंकता येतात.

छत्रपती संभाजीनगर : महायुती आणि महाविकास आघाडी हे दोघे निवडणुकांत कोंबड्यासारखे झुंजतात. आपल्याला वाटते ही खरीच झुंज आहे. पण, ही नौटंकीची झुंज आहे, हे लक्षात घ्यावे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल, तर वंचितच्या उमेदवारास मतदान करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांच्या प्रचारार्थ आमखास मैदानावर शनिवारी रात्री आंबेडकर यांची सभा झाली. यावेळी उमेदवार अफसर खान, जावेद कुरेशी, प्रभाकर बकले, किशन चव्हाण, अमित भुईगळ, सय्यद जफर यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महायुती व महाविकास आघाडीचे निवडणुकीत नात्यागोत्याचेच उमेदवार आहेत. हे सर्व श्रीमंत मराठा समाजाचे उमेदवार आहेत. जरांगे पाटलांनी ज्या गरीब मराठ्यासाठी लढा उभारला होता. त्याच्यातला एकही उमेदवार दिलेला नाही. सत्ता मराठा घराणेशाहीच्याच हातामध्ये राहणार आहे. ज्या घराणेशाहीला सत्ता देणार आहात तो शरीराचा एक डावा हात आहे आणि दुसरा उजवा हात आहे. सत्ता डाव्या हाताकडे आली काय किंवा उजव्या हाताकडे आली, ती शरीराकडेच आली म्हणजे कुटुंबाकडे आली, अशी परिस्थिती आहे. मुस्लीम बांधवांना आवाहन आहे की, हिंदू समाजाचा मतदार सेक्युलर विचाराचा आहे. देशात सेक्युलर राजकारण उभे राहिले पाहिजे, यासाठी आपल्या समाजाच्या विरोधात जाऊन त्याने मतदान दिले. त्याची कदर करायला हवी. मुसलमानांना वेगळे पाडण्याचे भाजपचे जे राजकारण आहे, ते यशस्वी करण्याचे काम होता कामा नये.

महाविकास आघाडीसोबत युती करताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडे आमची मागणी होती की, सेक्युलर मतदाराला आश्वासन द्यावे की, पाच वर्षे तुम्ही भाजपसोबत जाणार नाही. आश्वासन दिले नाही ते दिले नाही. आता निवडणुकीच्या काळात मोदी सांगत सुटले आहेत की, उद्धवसेना आपल्यासोबत आल्याशिवाय राहणार नाही. हे संकेत आहेत उद्याचे. शिवसेना ही सेक्युलर झाली, असे तुम्हाला कसे वाटले हा माझा मुस्लीम बांधवांना प्रश्न आहे, जर आता मुस्लीम समाज चुकला, तर परत ही संधी मिळणार नाही.

एमआयएमने खंजीर खुपसलाआंबेडकर यांनी मुस्लीम समाजाला इशारा दिला की, एका समाजावर निवडणुका जिंकता येत नाहीत. सर्वसमावेशक मतांवरच निवडणुका जिंकता येतात. मागच्या निवडणुकीत वंचितने एमआयएमसोबत युतीमध्ये मुस्लीम उमेदवार दिला होता. विधानसभेत याच एमआयएमने वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला. एकट्या मुस्लीम मतावर एमआयएमचा उमेदवार जिंकून आला नाही, तो इथल्या ओबीसींच्या मतावर जिंकून आला. ओवैसी असेल किंवा इतर कोणी असतील, युती केल्यानंतर युतीचा धर्म निभावावा लागतो, तो निभावता येत नसेल तर युती करू नका, असे ते म्हणाले.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर