शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

पावसाचा जोर कमी होईना! मराठवाड्यात ४७ मंडळांत अतिवृष्टी, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 13:03 IST

यंदाच्या पावसाळ्यात १२० मंडलांत एकवेळा, ९५ मंडलांत दोनवेळा आणि ४८ मंडलांत तीनवेळा अतिवृष्टी झाली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात परतीच्या पावसाने दाणादाण उडत असून, पावसाचा जोर अद्याप कमी झालेला नाही. मागील सात दिवसांत ४७ मंडलांत अतिवृष्टी झाली असून, मंगळवारी सकाळपर्यंत १३ मंडलांत ६५ मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस नोंदविला गेला आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात पावसाने दाणादाण उडविली आहे. खरीप हंगामातील शिल्लक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात १२० मंडलांत एकवेळा, ९५ मंडलांत दोनवेळा आणि ४८ मंडलांत तीनवेळा अतिवृष्टी झाली आहे. १७ मंडलांत चारवेळा, ५ मंडलांत पाचवेळा, ६ मंडलांत सहावेळा अतिवृष्टी झाली आहे. नांदेड जिल्ह्यात सातवेळा अतिवृष्टी झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात ८२ नागरिकांचा बळी गेला आहे. त्याचबरोबर १ हजार १७१ लहान-मोठी जनावरे पावसाळ्यात दगावली. ९ हजार ९२१ मालमत्तांची पडझड झाली. विभागाच्या ६७९ वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत ८८२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या तुलनेत १२३ टक्के असून, गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत १ हजार १०० मि. मी. पाऊस झाला होता. विभागात यंदाच्या पावसाळ्यात ४५० पैकी २९४ मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. विभागातील निम्न दुधना वगळता सर्व ११ प्रकल्पांमध्ये १०० टक्के जलसाठा होत आहे. ८७५ लघू व मध्यम प्रकल्पांत सध्या ९० टक्के जलसाठा आहे.

१८ ऑक्टोबर रोजी या ठिकाणी अतिवृष्टी१८ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, चापानेर, चिकलठाण, सिल्लोडमधील अंभई, सोयगावमधील बनोटी मंडलात सरासरी ७० मि.मी. पाऊस बरसला. जालना जिल्ह्यातील कुंभारझरी, ग्रामीण, अंबड, सुखापुरी, घनसावंगी मंडळात सरासरी ८० मि.मी.च्या आसपास पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील मादळमोळी, पाचेगाव, चकलांबा मंडलात सरासरी ६८ मि.मी. पाऊस झाला. १७ रोजी १० मंडलांत अतिवृष्टी झाली होती. ७ ऑक्टोबर रोजी १४ मंडलांत त्यानंतर ८ ते १३ ऑक्टोबरदरम्यान १० मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली होती.

रात्रीतून होतो पाऊसऑक्टोबर महिन्यात आजवर १८ दिवसांत दिवसा पावसाचे प्रमाण कमी राहिले असून, रात्री मुसळधार पाऊस होण्याचे प्रमाण वाढले आहे. मध्यरात्री पाऊस सुरू होऊन पहाटेपर्यंत बरसत असल्याचा अनुभव आहे. पुढील काही दिवस पाऊस पडले, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी