शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

महायुतीने तिघांच्या कोट्यातील ३-३ जागा रिपाइंला द्याव्यात; रामदास आठवले यांचा प्रस्ताव

By विजय सरवदे | Published: October 05, 2024 2:38 PM

लोकसभा निवडणुकीत रिपाइंमुळे राज्यामध्ये १७ जागा निवडून आल्या, याचा विचार करून महायुतीच्या नेतृत्वाने रिपाइंला किमान ९ जागा दिल्या पाहिजे.

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत रिपाइंमुळे महायुतीच्या अनेक जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे आम्हाला दुर्लक्षित करून चालणार नाही. विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या कोट्यातून आम्हाला प्रत्येकी ३-३ जागा द्याव्यात, अशी आमची मागणी आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे सांगितले.

रिपाइंच्या स्थानिक कार्यक्रमासाठी ते शनिवारी शहरात आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत आठवले म्हणाले, लोकसभा निवडणुकीत रिपाइंमुळे राज्यामध्ये १७ जागा निवडून आल्या. पडलेल्या उमेदवारांच्या मतांमध्येही रिपाइंच्या मतांची टक्केवारी जास्त आहे. याचा विचार करून महायुतीच्या नेतृत्वाने रिपाइंला किमान ९ जागा दिल्या पाहिजे. तसे आम्ही १०-१२ जागांचा प्रस्ताव दिला आहे. याशिवाय,'एमएलसी'च्या १२ जागांपैकी १ जागा व २-३ महामंडळांवर आमच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावली पाहिजे.

प्रकाश आंबेडकर मुत्सद्दी नेतेप्रकाश आंबेडकर हे मुत्सद्दी नेते आहेत. त्यांचा मला आदरच आहे. आम्ही दोघे एकत्र आलो तर राजकारणाचे चित्र वेगळे दिसेल. यासाठी मी मंत्रीपदाचा त्याग करायला सुद्धा तयार आहे. पण, हा प्रस्ताव त्यांना मान्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आणखी १०-१५ वर्षाचे आयुर्मान मिळाले असते तर ते या देशाचे पंतप्रधान राहिले असते. त्यांना समाज एकसंघ हवा होता. त्यामुळेच त्यांनी रिपब्लिकन पक्षाची संरचना तयार केली होती. 

बुद्धलेणीला धक्का लागणार नाहीबुद्धलेणीला भेट देऊन भिक्खू संघासोबत चर्चा केली. मराठवाड्यातील बौद्धांचे हे श्रद्धास्थान आहे. यासंदर्भात आपण सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना बोललो तेव्हा त्यांनी या परिसरातील एकाही वास्तुला धक्का लागणार नाही, असे आश्वासन दिले. ही जागा वनविभागाची असून भिक्खू संघाच्या मागण्यांबाबत आपण मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे. त्यामुळे बौद्ध अनुयायांनी सोमवारचा महामोर्चा शांततेत काढावा. यावेळी बाबुराव कदम, मिलिंद शेळके, किशोर थोरात, संजय ठोकळ, विजय मगरे, बाळकृष्ण इंगळे, नागराज गायकवाड उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेAurangabadऔरंगाबादMahayutiमहायुतीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024