शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लोकसभेला महाराष्ट्रात झालेलं मतदान मोदी-शाह यांच्याविरोधातील, पण...; राज ठाकरेंनी सांगितलं गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 15:48 IST

छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले.

Raj Thackeray On MVA ( Marathi News ) : "लोकसभेचा जो महाराष्ट्रातील निकाल आला त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना असं वाटलं की मराठवाड्यात आपल्यामुळे महाविकास आघाडीला चांगलं मतदान झालं. मात्र या दोन्ही नेत्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, ते मतदान तुमच्या प्रेमाखातर मिळालेलं नसून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधातील मतदान होतं. विरोधक जिंकत नसतात, सत्ताधारी हरत असतात, हे मी नेहमी सांगतो. यावेळी देशात मुस्लीम समाजाने मोदींविरोधात मोठ्या प्रमाणात मतदान केलं, तसंच दलित बांधवांनीही संविधान वाचवण्याच्या मुद्द्यावर भाजपविरोधात मतदान केलं. त्यामुळेच असा निकाल लागला आहे. मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा गैरसमज झाला आहे. त्यांना असं वाटतंय की विधानसभेलाही आपल्याला असं मतदान होईल. त्यामुळेच जातीचं राजकारण केलं जात आहे," अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा समाचार घेतला आहे.

राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यादरम्यान मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत त्यांना ठिकठिकाणी विरोध दर्शवण्यात आला. बीड इथं काल राज यांच्या गाडीसमोर सुपाऱ्या फेकल्याने मोठा गदारोळही झाला होता. या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. तसंच माझ्या नादी लागू नका, अन्यथा माझं मोहोळ उठल्यास तुम्हाला परवडणार नाही, अशा सज्जड इशाराही दिला आहे.

"आर्थिक निकषावर आरक्षण ही आमची भूमिका"

आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले की, "माझा पक्ष स्थापन झाल्यापासून आमची भूमिका आहे की आरक्षण हे आर्थिक निकषावर मिळायला हवं. तीच भूमिका अजूनही कामय आहे. जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांना वर आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. खरंतर महाराष्ट्रासारख्या राज्यात आरक्षणाचीच गरज नाही, असं माझं मत आहे. कारण देशातील इतर कोणत्याही राज्यांपेक्षा आपलं राज्य अधिक समृद्ध असून इथं आपल्या लोकांना नोकऱ्या आणि शिक्षण देता येऊ शकतं. मात्र बाहेरच्या लोकांना या नोकऱ्या दिल्या जात आहेत," असं राज यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, "माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल घोषणाबाजी करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुखाला मार मार मारला. बरं झालं पोलीस मध्ये पडले. मात्र त्याला मारल्यानंतर तो एक मराठा, लाख मराठा, अशा घोषणा देऊ लागला. म्हणजे यांना हे सगळं मनोज जरांगे पाटील यांच्याकडून होत असल्याचं दाखून जरांगे पाटलांच्या आडून राजकारण करायचं आहे. ही गोष्टी राज्यातील जनतेनं समजून घेतली पाहिजे," असंही राज ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील