शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

मराठा समाजाने सात दिवस शांततेत पाहावे; मनोज जरांगे पाटील यांची ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका

By बापू सोळुंके | Published: March 02, 2024 11:44 AM

जेलमध्ये गेलो तरी तेथेही उपोषण करीन. समाजाने एकजूट आणि संयम ठेवून पाठीशी राहावे, असे आवाहन जरांगे यांनी केले.

छत्रपती संभाजीनगर : सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने लेकरांना त्रास होईल, असे कोणतेही आंदोलन करायचे नाही. मराठा समाजाविरोधात रचले जात असलेले षडयंत्र समाजाने सात दिवस शांततेने पाहावे, अशा शब्दात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी वेट ॲण्ड वॉचची भूमिका जाहीर केली. सात दिवसांनंतर आपण आंदोलनाची पुढील भूमिका जाहीर करू, असेही ते म्हणाले. 

उपोषणामुळे प्रकृती खालावल्यामुळे चार दिवसांपासून शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जरांगे यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत आरक्षण पाहिजे. तसेच सगे-सोयऱ्याचा कायदा करावा, अशी मराठा समाजाची मागणी आहे. या मागणीसाठी राज्यकर्त्यांना बोललो तेव्हा मराठा समाजांच्या आमदार, मंत्री यांनी समाजाच्या बाजूने बोलणे आवश्यक होते. मात्र त्यांनी आपल्या नेत्यांची बाजू घेत माझ्याविरोधात एसआयटी लावण्याची आणि अटकेची मागणी केली. मराठा आमदार, खासदारांना समाजापेक्षा नेता आणि पक्ष मोठा वाटतो, हे सगळे मराठा समाज पाहत असल्याचे जरांगे म्हणाले. जेलमध्ये गेलो तरी तेथेही उपोषण करीन. समाजाने एकजूट आणि संयम ठेवून पाठीशी राहावे, असे आवाहन जरांगे यांनी केले. 

प्रक्रिया सहा महिन्यांपासून सुरूचअंतरवाली सराटी येथील उपोषणकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. सहा महिने झाले तरी ही गुन्हे परत घेतले नाहीत. प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जाते. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हे मागे घ्यावीत आणि सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करावी, मराठा समाज तुमच्यासोबत असेल, असे जरांगे म्हणाले. कुणबी प्रमाणपत्र वाटप का थांबविले आणि कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याची मोहीम का बंद आहे, असा सवालही त्यांनी राज्य सरकारला केला.

४ रोजी सोलापूरच्या दौऱ्यावरशुक्रवारी दुपारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यांनतर जरांगे अंतरवाली सराटीकडे रवाना झाले. ते ४ मार्च रोजी सोलापूर जिल्ह्यात जनसंवाद बैठकीला व ५ अणि ६ रोजी बीड जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना हजर राहतील.

भजपा मादिक भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जरांगे यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांना संविधान भेट दिले. मराठा कार्यकर्ते सोशल मीडियावर भाजप महिला पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ करतात, अशी तक्रार त्यांनी जरांगे यांच्याकडे केली. जरांगे यांनी भाजपच्याच नव्हे तर कोणत्याही महिलेला शिवीगाळ खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना