शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘एनआयसीयू’त दाखल तान्हुल्यांची संख्या वाढतेय; ३ हजार तान्हुले पुन्हा आईच्या कुशीत

By संतोष हिरेमठ | Updated: March 11, 2024 12:24 IST

आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या, तरच सुदृढ बाळ; ७ वर्षांत ‘एनआयसीयू’त दाखल होणाऱ्या तान्हुल्यांमध्ये एक हजाराने वाढ

छत्रपती संभाजीनगर : जन्मानंतर आईच्या कुशीत जाण्याऐवजी दररोज अनेक तान्हुले ‘एनआयसीयू’त दाखल होत आहेत. सर्वसामान्यांच्या भाषेत काचेच्या पेटीत. मात्र, वर्षभरात सुमारे ३ हजार शिशूंना पुन्हा आईच्या कुशीत सुरक्षितपणे पाठविण्याची किमया घाटीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागाने केली. गेल्या ७ वर्षात ‘एनआयसीयू’त दाखल होणाऱ्या तान्हुल्यांमध्ये एक हजाराने वाढ झाली आहे.

घाटीतील प्रसूतिशास्त्र विभागात दररोज ६० ते ७० प्रसूती होतात. त्यातील दररोज १०-१२ नवजात शिशू हे नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल होतात. यामध्ये ६० टक्के बालके ही कमी वजनाची आणि अपूर्वकालीन प्रसूतीत जन्मलेली असतात. ४२ खाटांच्या या विभागात एकावेळी ६० ते ७० अत्यवस्थ नवजात शिशू उपचार घेत असतात. गेल्या वर्षभरात तब्बल ३ हजार २३३ शिशूंना ‘एनआयसीयू’त दाखल करावे लागले. दुर्दैवाने २१० शिशू दगावले.

‘एनआयसीयू’त का होतात दाखल?प्रामुख्याने अपूर्वकालीन प्रसूती, कमी वजनाची बालके, जन्मतः न रडणारे शिशू, जन्मतः बाह्य किंवा अंतर्गत अवयवांचे व्यंग असणाऱ्या शिशूंचा समावेश असतो. रक्तदाब, किडनीचे आजार, थायरॉइड, दमा, हृदयाचे आजार, थॅलेसेमिया आजार असलेल्या स्त्रियांनी मातृत्व स्वीकारण्याआधीच या आजाराचा धोका लक्षात घेऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. योग, प्राणायाम व पुरेशी झोप घेतल्यास मानसिक स्वास्थ्यही चांगले राहील, असे तज्ज्ञांनी म्हटले.

घाटीतील २०१६ ची स्थिती

एकूण प्रसूती - १६ हजार २८८‘एनआयसीयू’त दाखल शिशू- २ हजार १५५

घाटीतील २०२३ ची स्थितीएकूण प्रसूती - १९ हजार ४५१‘एनआयसीयू’त दाखल शिशू- ३ हजार २३३

आहाराकडे द्या लक्षलहानपणापासूनच मुलींच्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. गरोदरपणात डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार आयर्न, कॅल्शियमच्या गोळ्या घ्याव्या. गरोदर मातांनी कोणत्याही गोष्टीचे ‘टेन्शन’ घेऊ नये. वेगवेगळ्या प्रदूषणांचाही गर्भातील बाळावर परिणाम होतो.- डाॅ. एल. एस. देशमुख, नवजात शिशू अतिदक्षता विभागप्रमुख, घाटी

गर्भधारणेपूर्वीपासून घ्या काळजीसुरक्षित मातृत्वासाठी महिलेचे वय हे किमान २० वर्षे असावे. गर्भधारणा होण्यापूर्वी तीन महिने आधीपासून फॉलिक ॲसिडच्या गोळ्यांचे सेवन करावे. गरोदर मातेला पौष्टिक, समतोल प्रोटीन व जीवनसत्त्वयुक्त आहार देणे बाळाच्या वाढीसाठी आणि मातेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.- डाॅ. घनश्याम मगर, स्त्रीरोग, वंध्यत्वतज्ज्ञ व लॅप्रोस्कोपी सर्जन

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्यpregnant womanगर्भवती महिला