शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वैद्यकीय कचरा उचलणाऱ्या नापास कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ‘ग्रेस’ मार्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 19:13 IST

जिल्हा प्रशासन, महापालिका अवाक् ; प्रदूषण मंडळ आरोपीच्या पिंजऱ्यात

छत्रपती संभाजीनगर : शहर आणि परिसरातील वैद्यकीय कचरा जमा करणे, त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी गाेवा येथील कंपनीची नेमणूक करण्यात आली. मागील २० वर्षांपासून मनपा हद्दीसह जिल्ह्यातील कचरा जमा करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुढील कामासाठी परस्पर हिरवी झेंडी दाखविली. त्यामुळे सध्या जिल्हाधिकारी, महापालिका प्रशासक विरुद्ध प्रदूषण नियंत्रण मंडळ असा सामना रंगला आहे. मंडळाने परस्पर वॉटरग्रेसला कामाची मुभा कशी दिली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

महापालिकेने २२ वर्षांपूर्वी वैद्यकीय कचरा संकलन करणे, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी नाशिकच्या वॉटर ग्रेस कंपनीची नेमणूक केली. शासकीय, खासगी रुग्णालयांमधील कचरा जमा करण्याचे काम कंपनी करीत होती. कंपनीचा कार्यकाल दोन वर्षांपूर्वी संपला. मनपाने नवीन अत्याधुनिक पद्धतीने काम करणाऱ्या कंपनीचा शोध सुरू केला. निविदा प्रक्रियेत गोवा येथील कंपनी सर्वोत्कृष्ट ठरली. आता या कंपनीला काम देण्यात आले. दरम्यान, लाखो रुपयांचे काम हातातून जात असल्याचे लक्षात येताच वॉटरग्रेस कंपनीने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून जिल्ह्यातील संपूर्ण कचरा जमा करण्याचे काम त्यांनाच मिळावे, असा प्रस्ताव तयार करून घेतला. हा प्रस्ताव परस्पर शासनाकडे मंजुरीसाठी पाठवून दिला. वास्तविक पाहता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेली संनियंत्रण समिती अंतिम निर्णय घेते. समितीला अंधारात ठेवून प्रदूषण नियंत्रण मंडळाने वॉटरग्रेसच्या बाजूने प्रस्ताव दिला. यावर मनपा प्रशासक, जिल्हाधिकारी यांनी तीव्र शब्दात नाराजी दर्शविली. या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळातील उपविभागीय अधिकारी अच्युत नंदवते यांनी बोलण्यास नकार दिला.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसवैद्यकीय कचरा नष्ट करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीला यापूर्वी अनेकदा प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावल्या आहेत. शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाही, असा आरोप होता. आता अचानक प्रदूषण नियंत्रण मंडळाने याच कंपनीच्या बाजूने प्रस्ताव कसा दिला यावर आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

२२ वर्ष लाखोंची कमाईवॉटरग्रेस कंपनी शहरातील १० हजार बेडनुसार रुग्णालयांकडून मनपाने ठरवून दिलेल्या दरानुसार पैसे वसूल करीत होती. मनपाला रॉयल्टी म्हणून एकूण साडेतीन ते चार लाख रुपये दरमहा मिळत होते. कंपनी शहरातून किमान १६ लाख रुपये वसूल करीत. कचरा संकलनासाठी कंपनीकडे ९ वाहने होती. दररोज अडीच मेट्रिक टन कचरा जमा होतो.

आम्हाला सर्वोत्कृष्ट काम हवेशहरासाठी सर्वोत्कृष्ट काम हवे. गोवा येथील कंपनीचे प्लांट मनपा अधिकाऱ्यांनी बघितले. देशातील अन्य प्लांटही बघितले. सर्वोत्कृष्ट काम म्हणून गोवा येथील कंपनीचे होते. त्यांनाच हे काम दिले जाईल. जुन्या कंपनीने काहीही केले तरी ते नियमबाह्य आहे.- जी. श्रीकांत, मनपा प्रशासक.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाpollutionप्रदूषण