शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळी भांडणं मिटवतो, पण आधी शपथ घ्या की...; 'मनसे' युतीसाठी उद्धव ठाकरेंनी बंधूंसमोर ठेवली एक अट!
2
ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी!
3
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
4
Anaya Bangar Boy to Girl Transition Story: संजय बांगरचा मुलगा का बनली मुलगी? 'ट्रान्सजेंडर' Anaya Bangar ने सगळंच सांगून टाकलं...
5
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 'या' दिवशी ६ तासांसाठी बंद राहणार!
6
FD vs SIP: कोणता पर्याय ठरू शकतो बेस्ट, फायदा-तोट्याचं गणित समजून घ्या
7
“मराठीला हिंदी नाही तर गुजरातीपासून सर्वाधिक धोका”; संजय राऊतांची मनसे, भाजपावर टीका
8
Tarot Card: सुरवंटाचे फुलपाखरू होण्याचा काळ, प्रयत्नात कुचराई नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
9
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
10
प्रेमाचा जांगडगुत्ता! मुलीच्या सासऱ्यासोबतच ममता झाली फरार; महिलेच्या पतीला दुःख अनावर
11
कोट्याधीश करणारा वसुमती योग: ८ राशींना शुभ, उत्पन्न वाढेल; हाती पैसा राहील, लाभच लाभ होतील!
12
५ वर्षांपूर्वी मृत्यू झालेला 'तो' रिक्षा चालवताना सापडला; पत्नीशी WhatsApp वर चॅटिंग, अखेर...
13
एका शेअरवर ₹११७ चा डिविडेंड देतेय कंपनी, रेकॉर्ड डेट आता जास्त दूर नाही; पाहा कोणता आहे शेअर?
14
Mumbai: बीएमसीने 'अभय' देऊनही मुंबईकरांनी केलं दुर्लक्ष, आता भरा दोन टक्के दंड 
15
चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ मोठी जलवाहिनी फुटली; 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद!
16
मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
17
मुंबई: स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी पत्नीला पाठवला व्हिडीओ, म्हणाला, 'जगण्याची इच्छा नाही'
18
चीनकडून येणारा निकृष्ट दर्जाचा माल रोखण्याचा डाव भारतावरच उलटला! कोणाची समस्या वाढली?
19
आता इलॉन मस्क जगात वाटताहेत शुक्राणू, महिलांशी संपर्क, मुलांची ‘फौज’ तयार करणार
20
"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली

छत्रपती संभाजीनगरवासी करतात दररोज १०० टन खाद्यतेल फस्त !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 17:50 IST

खाद्यतेलाचा वापर केलाच पाहिजे, पण अतिवापर करणे टाळावे. दररोज प्रतिव्यक्तीने १५ ते २० एमएलपेक्षा अधिक खाद्यतेल खाऊ नये.

छत्रपती संभाजीनगर : देशातील नागरिकांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे खाद्यतेल होय. निरोगी आयुष्यासाठी तेलाचा अतिवापर टाळा असा कानमंत्र खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिला आहे. एकट्या छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर येथे दररोज १०० टन खाद्यतेलाची विक्री होते, आता बोला.

१८ लाख लोक दररोज खातात १०० टन खाद्यतेलछत्रपती संभाजीनगर शहराची लोकसंख्या सुमारे १८ लाख आहे. पॅकिंग व सुटे खाद्यतेल मिळून दररोज अंदाजे १०० टन खाद्यतेलाची उलाढाल होते. प्रतिव्यक्ती सुमारे ७० ते ८० ग्रॅम तेलाचे दररोज सेवन करतो, असा याचा अर्थ होतो. उल्लेखनीय बाब म्हणजे, आहारतज्ज्ञांच्या मते, ४० वर्षांवरील प्रतिव्यक्ती दररोज १५ ते २० एमएल तेल, तर ४० वर्षांखालील व्यक्तींनी २० ते २५ एमएल तेल दररोज खाल्ले पाहिजे.

शहरवासीयांना आवडते सोयाबीन तेलकरडी तेल व शेंगदाणा तेलाचे भाव गगनाला भिडल्याने शहरवासी मागील काही महिन्यांपासून सोयाबीन तेलाला पहिली पसंती देत आहेत. १०० टन पैकी ६० ते ७० टन सोयाबीन तेल विकते. २० ते ३० टन सूर्यफूल तेल विकते, तर उर्वरित १० टन तेलामध्ये करडीतेल, शेंगदाणा, सरकी, पामतेल, राईस ब्रॅन तेल, सरसो तेलाचा समावेश होतो. यात ५० टक्के पॅकिंगचे, तर ५० टक्के सुट्टे तेल विकले जात असल्याची माहिती होलसेल व्यापारी राकेश पांडे यांनी दिली.

एका कुटुंबाला महिन्याला किती लागते तेल ?पती-पत्नी व त्यांचे दोन मुले, अशा चार जणांच्या कुटुंबाला महिन्याकाठी किती तेल लागते. याविषयी माहिती घेतली असता. किराणा दुकानात येणाऱ्या यादीवरून सुमारे ४.५० ते ५ लिटर खाद्यतेल खरेदी करीत असल्याचे निदर्शनात आले. अनिल पवार या व्यक्तीने सांगितले की, आम्ही दोघे व आमच्या दोन मुली असे आमचे कुटुंब आहे. दर महिन्याला आम्ही सोयाबीन किंवा सूर्यफुल तेलाची पाच लिटरची कॅन लागते.

अदलूनबदलून तेल खरेदी कराखाद्यतेलाचा वापर केलाच पाहिजे, पण अतिवापर करणे टाळावे. दररोज प्रतिव्यक्तीने १५ ते २० एमएलपेक्षा अधिक खाद्यतेल खाऊ नये. प्रत्येक तेलाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. उष्मांक वेगवेगळा असतो. यामुळे दर महिन्याला एकच तेल खरेदी न करता. प्रत्येक महिन्याला खाद्यतेल बदलून वापरत जा. एका महिन्यात सोयाबीन, तर दुसऱ्या महिन्यात सूर्यफूल, तर तिसऱ्या महिन्यात शेंगदाणा तेल असे बदलून वापरत जावे, मात्र तेलाचे प्रमाण मात्र नक्की पाळावे.अलका कर्णिक, आहारतज्ज्ञ

टॅग्स :foodअन्नchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर