शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

जलवाहिनीवरील रस्त्याचा वापर होणार नाही; मुख्यमंत्र्यांचाही प्रश्न, पाणी कधी देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 14:12 IST

नॅशनल हायवेने रस्त्याची रुंदी वाढविण्यासाठी स्वतंत्रपणे भूसंपादन करावे, असा निर्णय घेण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर : पैठण रोडवर २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर नॅशनल हायवेने चक्क रस्ता तयार केला. ‘लोकमत’ने चूक कुणाची, शिक्षा कुणाला? या अंतर्गत वृत्त मालिका प्रकाशित केली. याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. जलवाहिनीवर रस्ता तयार केला असला, तरी वाहतुकीसाठी त्याचा वापर अजिबात करता येणार नाही. नॅशनल हायवेने रस्त्याची रुंदी वाढविण्यासाठी स्वतंत्रपणे भूसंपादन करावे, असा निर्णय घेण्यात आला. मार्चपूर्वी शहरात किमान ३५० एमएलडी पाणी येईल, असा विश्वास मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला.

२७४० कोटी रुपये खर्च करून शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेत जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २५०० मिमी व्यासाची मोठी जलवाहिनी टाकण्यात येत आहे. आतापर्यंत ३४ किमी जलवाहिनी टाकण्याचे कामही पूर्ण झाले. त्यावर १२ किमीपर्यंत नॅशनल हायवेने रस्ता तयार केला. त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आक्षेप घेतला. ‘लोकमत’ने सातत्याने हा विषय लावून धरला. मागील आठवड्यात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने रस्त्याची पाहणीही केली.

मुख्यमंत्र्यांचाही प्रश्न; पाणी कधी देणार?दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेचा आढावा घेतला. त्यांनी पहिला प्रश्न अधिकाऱ्यांना केला की, छत्रपती संभाजीनगरला पाणी कधी देणार? जलवाहिनीवर रस्ता तयार करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जलवाहिनीचे काम थांबवू नका, असे निर्देश त्यांनी दिले. मार्चपूर्वी पहिला टप्पा पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. जलवाहिनीवर तयार केलेला रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. जलवाहिनीच्या बाजूला लोखंडी बॅरिकेट्स राहतील. रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्यासदेखील मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शविली आहे.

दररोज ३५० एमएलडी पाणीनवीन पाणीपुरवठा योजनेत शहराला रोज २०० एमएलडी पाणी मिळेल. ९०० मिमी व्यासाच्या नवीन जलवाहिनीतून ७५ एमएलडी आणि जुन्या १२०० मिमीच्या जलवाहिनीतून ८० एमएलडी पाणी मिळाले तर शहराला ३०० वर एमएलडी पाणी मिळेल. रोज पाणीपुरवठा होऊ शकेल. यंदा उन्हाळ्यात शहरवासीयांना अजिबात त्रास होणार नाही, असे प्रशासक म्हणाले.

नवीन जलकुंभांचा वापरमजीप्राने मनपाला काही जलकुंभ दिले. हनुमान टेकडी, हिमायतबाग, शिवाजी ग्राऊंड, टीव्ही सेंटर येथून पाणी देण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना प्रेशरने पाणी मिळू लागले आहे. पाणीपुरवठ्याचे टप्पे कमी झाले. काही जलकुंभांवरील भार कमी झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMuncipal Corporationनगर पालिकाWaterपाणी