शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

उपाहासात्मक रक्षाबंधन; ‘उमेद'च्या महिला कर्मचारी मुख्यमंत्र्यांना पाठविणार ट्रकभर राख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 19:33 IST

‘उमेद’च्या महिला व कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न या संघटनेचे उपस्थित केला आहे.

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत (उमेद) कार्यरत महिला कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्ह्यातून दीड लाख, तर राज्यभरातून जवळपास १ कोटी राख्या पाठविल्या जाणार आहेत. हे वाचून मुख्यमंत्र्यांप्रती महिला कर्मचाऱ्यांचे किती प्रेम, असेच वाटले असेल ना. पण, हे प्रेम-बीम काही नाही. हा आंदोलनाचाच एक भाग आहे.

राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) आस्थापनेस नियमित विभाग म्हणून मान्यता द्यावी, या अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी, अधिकारी आणि समुदाय संसाधन व्यक्तींना सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, या मागणीसाठी ‘उमेद’ महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेने ८ जुलै रोजी आझाद मैदान येथे आंदोलन केले होते. उमेद अभियानाने आतापर्यंत ८० लाख महिलांना एकत्रित केले असून ४ कोटींपेक्षा जास्त व्यक्ती या अभियानाच्या माध्यमातून जोडल्या आहेत. ७ लाख स्वयंसहायता समूह, ३१ हजार ग्रामसंघ, तर २ हजार प्रभागसंघ तयार झाले आहेत. एवढी मोठी संस्था बांधणीचे काम या अभियानाने केले आहे. तरीही या अभियानात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते.

८ जुलै रोजी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कळविले होते की, अन्य विभागांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी कोणते धोरण अवलंबिले आहे किंवा अन्य राज्यात अशा कर्मचाऱ्यांसंबंधी कोणता निर्णय घेतला आहे, याचा अभ्यास करून निर्णय घेऊ. मात्र, अद्यापही त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संघटनेच्या मागण्यांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचे लक्ष वेधण्यासाठी रक्षाबंधन या दिवशी त्यांना राख्या पाठविण्यात येणार आहे, असे संघटनेचे महिला जिल्हाध्यक्ष वंदना जोगदंड व कर्मचारी जिल्हाध्यक्ष सचिन सोनवणे यांनी कळविले आहे.

ट्रकने पाठविणार राख्याएकीकडे मुख्यमंत्री महिलांसाठी कल्याणकारी योजना राबवीत आहेत. यात लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, मुलींना उच्च शिक्षणापर्यंतचे मोफत शिक्षण, याशिवाय शासनाने २५ लाख महिलांना लखपतीदीदी बनविण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. बचतगटांतील महिलांचे खेळते भांडवल १५ हजारांवरून ३० हजार करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांना मोफत ५० टक्क्यांपर्यंत मोफत एसटी प्रवास. मग, ‘उमेद’च्या महिला व कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न या संघटनेचे उपस्थित केला आहे. त्यामुळे मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातून ट्रकभर राख्या पाठविल्या जाणार आहेत.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनAurangabadऔरंगाबाद