शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

उपाहासात्मक रक्षाबंधन; ‘उमेद'च्या महिला कर्मचारी मुख्यमंत्र्यांना पाठविणार ट्रकभर राख्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 7:31 PM

‘उमेद’च्या महिला व कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न या संघटनेचे उपस्थित केला आहे.

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत (उमेद) कार्यरत महिला कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्ह्यातून दीड लाख, तर राज्यभरातून जवळपास १ कोटी राख्या पाठविल्या जाणार आहेत. हे वाचून मुख्यमंत्र्यांप्रती महिला कर्मचाऱ्यांचे किती प्रेम, असेच वाटले असेल ना. पण, हे प्रेम-बीम काही नाही. हा आंदोलनाचाच एक भाग आहे.

राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) आस्थापनेस नियमित विभाग म्हणून मान्यता द्यावी, या अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी, अधिकारी आणि समुदाय संसाधन व्यक्तींना सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, या मागणीसाठी ‘उमेद’ महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेने ८ जुलै रोजी आझाद मैदान येथे आंदोलन केले होते. उमेद अभियानाने आतापर्यंत ८० लाख महिलांना एकत्रित केले असून ४ कोटींपेक्षा जास्त व्यक्ती या अभियानाच्या माध्यमातून जोडल्या आहेत. ७ लाख स्वयंसहायता समूह, ३१ हजार ग्रामसंघ, तर २ हजार प्रभागसंघ तयार झाले आहेत. एवढी मोठी संस्था बांधणीचे काम या अभियानाने केले आहे. तरीही या अभियानात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते.

८ जुलै रोजी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कळविले होते की, अन्य विभागांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी कोणते धोरण अवलंबिले आहे किंवा अन्य राज्यात अशा कर्मचाऱ्यांसंबंधी कोणता निर्णय घेतला आहे, याचा अभ्यास करून निर्णय घेऊ. मात्र, अद्यापही त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संघटनेच्या मागण्यांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचे लक्ष वेधण्यासाठी रक्षाबंधन या दिवशी त्यांना राख्या पाठविण्यात येणार आहे, असे संघटनेचे महिला जिल्हाध्यक्ष वंदना जोगदंड व कर्मचारी जिल्हाध्यक्ष सचिन सोनवणे यांनी कळविले आहे.

ट्रकने पाठविणार राख्याएकीकडे मुख्यमंत्री महिलांसाठी कल्याणकारी योजना राबवीत आहेत. यात लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, मुलींना उच्च शिक्षणापर्यंतचे मोफत शिक्षण, याशिवाय शासनाने २५ लाख महिलांना लखपतीदीदी बनविण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. बचतगटांतील महिलांचे खेळते भांडवल १५ हजारांवरून ३० हजार करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांना मोफत ५० टक्क्यांपर्यंत मोफत एसटी प्रवास. मग, ‘उमेद’च्या महिला व कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न या संघटनेचे उपस्थित केला आहे. त्यामुळे मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातून ट्रकभर राख्या पाठविल्या जाणार आहेत.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनAurangabadऔरंगाबाद