शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

हल्ल्यात अन्ननलिका तुटलेल्या तरुणाचा सहा दिवसांनी झाला मृत्यू

By सुमित डोळे | Published: August 18, 2023 8:29 PM

शिवीगाळ करून गळा, गुप्तांगावर लाथाबुक्क्यांनी मारहाण; पहिले किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल केल्याने उस्मानपुरा पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

छत्रपती संभाजीनगर : किरकोळ कारणावरून रमानगरातील अजिंक्य राजेश ठोंबरे (२३) या तरुणाला सात ते आठ जणांनी बेदम मारहाण केली. त्याच्या गळ्यावर फायटरने वार करत गुप्तांगावर लाथाबुक्क्यांचे ठोसे लगावले. १२ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी अजिंक्यचे घाटीत उपचार सुरू असताना गुरुवारी निधन झाले. अजिंक्यच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनीही चिंता व्यक्त केली असताना उस्मानपुरा पोलिसांनी मूळ गुन्ह्यात किरकोळ कलमे लावल्याने त्यांच्या भूमिकेवर नातेवाइकांनी प्रश्न उपस्थित केले. शनिवारी पोलिसांनी खुनाचे कलम वाढवत आरोपींना अटक करणे सुरू केले. तोपर्यंत आरोपी मोकाट फिरत होते.

अजिंक्य आई, वडील, दोन बहिणींसह रमानगरमध्ये राहत होता. काहीसा आजारी अजिंक्य त्याचे दैनंदिन काम करायचा. स्थानिक दुकाने, कार्यालयांमध्ये तो चहा देण्याचे काम करायचा. १२ ऑगस्ट रोजी रात्री अजिंक्य कामावरून घरी जाताना आराेपी चेतन कांबळे, बाळू कांबळे यांनी त्याला विनाकारण शिवीगाळ करून डिवचले. चिडलेल्या अजिंक्यनेही त्यांना प्रत्युत्तर दिले. जेवणानंतर तो आत्याकडे जात असताना चेतन, बाळूने त्याला पकडून पत्र्याच्या शेडजवळ नेले. तेथे आरोपीचे आई, आजी, बहीण, आजोबा व अन्य दोन मित्रांनी मिळून अजिंक्यला बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अजिंक्यची गुरुवारी मृत्यूशी झुंज अखेर संपली. डॉक्टरांनी शवविच्छेदनात शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा असून, अवयवांना गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचे नमूद केले.

शस्त्रक्रिया झाली; मारहाणीपासून अत्यावस्थचमारहाणीत अजिंक्यच्या खासगी अवयव व अन्ननलिकेला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रियादेखील केली. मारहाण इतकी गंभीर हाेती की त्याचे संपूर्ण शरीर सुजले होते. मात्र, उस्मानपुरा पोलिसांनी किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी प्रकरणाला गांभीर्याने घेतलेच नाही. गंभीर मारहाणीची घटना लपवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असा आरोपही संतप्त नातेवाइकांनी केला.

खुनाचा उद्देश स्पष्ट मग केवळ भादवी ३२४ का ?हल्लेखोरांच्या मारहाणीत अजिंक्य च्या खाजगी अवयवांसह अन्ननलिकेला गंभीर दुखापत होत्या. त्याला रस्त्यावर लाथाबुक्यांनी अक्षरक्ष: तुडवले. शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला केला. हा नियोजित कटात त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. परंतू पोलिसांनी त्यांचा उद्देश स्पष्ट असतानाही भादवी ३२६, ३०७ टाळून किरकोळ ३२४ का दाखल केला, असा गंभीर प्रश्न आता उस्मानपुरा पोलिसांच्या भुमिकेवर उपस्थित होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद