शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
5
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
6
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
7
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
8
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
9
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
10
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
14
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
15
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
16
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
17
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
18
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर

छत्रपती संभाजीनगरात जिकडेतिकडे पाण्यासाठी ओरड; जलसम्राटांनी शहराला सोडले वाऱ्यावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 17:17 IST

१३ दिवसांपासून ९०० मि.मी.ची जलवाहिनी बंद; दुरुस्तीसाठी मजीप्रा पुढाकार घेईना, गंभीर प्रश्नाकडे राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष

छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली तेव्हा काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांचे मोठमोठे होर्डिंग लावले. त्यांना ‘जलसम्राट’ अशी उपाधी देण्यात आली. चार वर्षे उलटली तरी योजना पूर्ण झाली नाही. १३ दिवसांपासून शहराला पाणीपुरवठा करणारी ९०० मि.मी.ची जलवाहिनी दुरुस्तीअभावी बंद पडली आहे. त्यानंतरही संबंधित यंत्रणेला खडसावून बोलण्याची हिंमत एकही राजकीय नेता दाखवायला तयार नाही.

शहराला उन्हाळ्यात अतिरिक्त ७५ एमएलडी पाणी मिळावे, यासाठी तब्बल २०० कोटी रुपये खर्च करून ९०० मि.मी. व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकली. जलवाहिनीतून फक्त २० एमएलडी पाणी येत होते. शहराच्या पाणीपुरवठ्याला यामुळे आधार मिळाला होता. २२ मार्च रोजी फारोळा फाटा येथे ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीच्या बाजूलाच २५०० मि.मी. व्यासाची मोठी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. या कामामुळे ९०० मि.मी. जलवाहिनीचे काही पाइप निखळले होते. दुरुस्तीसाठी म.जी.प्रा.ने तब्बल नऊ दिवस लावले. महापालिकेच्या प्रचंड आग्रहानंतर ३१ मार्च रोजी रात्री ११ वाजता जलवाहिनी कशीबशी सुरू झाली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता तीच जलवाहिनी फारोळा फाट्यापासून १०० मीटर अंतरावर परत २५०० मि.मी. व्यासाचा पाइप टाकताना फुटली. आज चार दिवस झाले तरी दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. एकूण १३ दिवसांपासून जलवाहिनी बंद आहे. शहराला दररोज २० एमएलडी पाण्याचा फटका बसतो आहे. त्यानंतरही शहरातील राजकीय नेते मूग गिळून गप्प आहेत. जलसम्राटांनी शहराला वाऱ्यावर सोडले का? अशी चर्च नागरिकांमध्ये सुरू आहे.

पाणीपुरवठा विस्कळीत करु नकामहाराष्ट्र जीवन प्राधिकरण शहराला वाढीव ७५ एमएलडी पाणी देऊ शकत नाही. निदान शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या ७००, १२०० आणि नवीन ९०० मि.मी. जलवाहिन्या सुरळीत ठेवाव्यात. या जलवाहिन्यांना धक्का लावू नये. धक्का लावला तर पाइप निखळणे, जलवाहिनी फुटणे असे प्रकार होत आहेत. त्यामुळे किमान दोन महिने सहकार्य करावे, अशी भूमिका महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतली आहे. कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे अशी वारंवार विनंतीसुद्धा केली.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी