शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

आली महापालिका निवडणूक; नागरिकांसाठी पाणी होणार स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 19:41 IST

१ एप्रिल २०२० पासून वार्षिक १८०० रुपये आकारण्याचे महापौरांचे आदेश 

ठळक मुद्दे २७५० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर ३१ मार्चपर्यंत ४५०० रुपयेच राहणार दर 

औरंगाबाद : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांना समोर ठेवून महापौर नंदकुमार घोडेले यांनी ४ हजार ५० वरून १८०० रुपये पाणीपट्टी १ एप्रिल २०२० पासून आकारून ती वसूल करावी, असे आदेश गुरुवारी सर्वसाधारण सभेत प्रशासनाला दिले. तत्कालीन आयुक्तांच्या काळातही पाणीपट्टी कपातीचा ठराव झाला होता; परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. विद्यमान आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्यासमक्ष पाणीपट्टी कपातीचे आदेश महापौरांनी स्वत:च्या अधिकारात दिले. यावर प्रशासन कशी अंमलबजावणी करणार हे येणाऱ्या काळात समोर येईल.

आयुक्तांनी पाणीपुरवठा वितरणाचा खर्च पाहता पाणीपट्टी कमी करणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ते महापौरांच्या आदेशाची अंमलबजावणी करतील का, याविषयी साशंकता आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत जुनीच म्हणजे ४०५० रुपये पाणीपट्टी घेणार काय? प्रशासनाच्या परवानगीने दर कपात केली आहे का? यावर महापौरांनी आम्ही अभ्यास करून निर्णय घेऊ. आयुक्तांना सांगू की, इतर शहरांत पाणीपट्टीचे दर कमी आहेत, शिवाय दररोज पाणीपुरवठा केला जातो, आपल्या शहरात दोन ते तीन दिवसांआड पाणी मिळते, त्यामुळे नागरिकांतून पाणीपट्टी आणि पाणीपुरवठा याबाबत रोष असल्याने येत्या आर्थिक वर्षापासून  ६० टक्के पाणीपट्टी कपात करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नळधारक, पाणीपट्टीचे रेकॉर्ड संकलित करणे, नळ अभययोजना राबविण्याचे आदेशही सभेत देण्यात आले. दरम्यान आजवर समांतर जलवाहिनीच्या अनुषंगाने पाणीपट्टी वसूल केली गेली. ती योजना तर झालीच नाही. मात्र, नागरिकांना २०१३ पासून वाढीव पाणीपट्टी भरावी लागत आहे.

अर्थसंकल्पीय सभेला गुरुवारी सकाळी सुरुवात झाल्यानंतर भाजपविरुद्ध शिवसेना असे वातावरण सभागृहात होते. दोन्ही पक्षांच्या सदस्यांमध्ये खडाजंगी होऊन झालेल्या गदारोळात महापौर घोडेले यांनी २०१९-२० च्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. २४२० कोटी ५ लाखांच्या स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात ३३० कोटींची वाढ सभेने केली. २७५० कोटी ५ लाखांच्या अर्थसंकल्पास त्यांनी मंजुरी दिली. दरम्यान समांतर जलवाहिनी योजनेसाठी पालिकेने शासनाकडून पाणीपट्टीचा उपविधी मंजूर करून घेतला आहे. पाणीपट्टी १८०० रुपयांवर  करायची असेल तर पूर्वीचा उपविधी रद्द करावा लागणार आहे. त्यासंबंधीचा प्रशासकीय प्रस्ताव मंजूर करून तो शासनाकडे पाठवावा लागेल. त्यानंतरच पाणीपट्टी कमी होईल, असेही मत काहीजण व्यक्त करीत आहेत.

अर्थसंकल्पाला मंजुरी देताना दिले हे आदेशकर वसुलीच्या उपाययोजनेसाठी आयुक्तांना अधिकार दिले. संत तुकाराम सिडको नाट्यगृहाचे खाजगीकरण करणे, मनपाच्या जागा, गाळे, सभागृह भाडेकरारावर देणे, थकीत कराचा दंड व व्याजात सवलत देण्याचा विचार, गुंठेवारी मालमत्तांना अधिकृत करणे, पीआर कार्ड देण्याबाबत जिल्हा प्रशासनाशी चर्चा करणे.४बीओटीच्या प्रकल्पांचे मूल्यांकन करणे, रोझ गार्डनचे खाजगीकरण करणे, युजर चार्ज मनपाने वसूल करणे, ५० कोटींची तरतूद, हेरिटेज सर्कल, फूड सफारी, हेरिटेज सफारी करण्यास सभेत मंजुरी देण्यात आली. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकरWaterपाणी