शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
4
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
5
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
6
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
7
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
8
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
9
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
10
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
11
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
12
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
13
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
14
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
15
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
16
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
17
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
18
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
19
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
20
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट

चर्चा तर होणारच, विकासाच्या ‘मोदी हमी’चा जाहीरनामा कसा वाटला?

By स. सो. खंडाळकर | Updated: April 19, 2024 15:52 IST

७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना, तसेच तृतीयपंथीयांना आयुष्यमान योजना लागू करण्याची घोषणा संकल्पपत्रात करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यात विकास आणि कल्याणकारी योजनांना केंद्रस्थानी ठेवून मतदारांना ‘ मोदी हमी’ दिली. ‘एक देश, एक निवडणूक’ आणि समान नागरी कायदा लागू करण्यास कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करून भाजपने आपल्या ‘ संकल्पपत्रा’द्वारे ‘विकसित भारत’च्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे सूचित केले.

७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना, तसेच तृतीयपंथीयांना आयुष्यमान योजना लागू करण्याची घोषणा संकल्पपत्रात करण्यात आली आहे. घोटाळेबाजांना दयामाया न दाखवता तुरुंगात टाकणारी भ्रष्टाचारविरोधी मोहीम यापुढेही चालू राहील, अशी हमी भाजपने दिली आहे. गरीबांसाठी तीन कोटी घरे, घरोघरी पाइपद्वारे गॅसपुरवठा, न्यायसंहिता तातडीने लागू करणार, नागरिक दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करणार, भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवणार, अशी आश्वासने यात देण्यात आली आहेत. मात्र रोजगारनिर्मिती, महागाई, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची अंमलबजावणी, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची हमी, जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा आदी वादग्रस्त ठरू शकणाऱ्या अनेक मुद्द्यांवर मौन बाळगण्यात आले आहे. भाजपच्या या जाहीरनाम्यावरच करण्यात आलेली ही साधकबाधक चर्चा...

एक उत्तम जाहीरनामा....भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची व्हावी, या दृष्टीने सादर करण्यात आलेला भाजपचा जाहीरनामा म्हणजे एक उत्तम जाहीरनामा होय. महिला, युवा, शेतकरी व गोरगरीब या चार घटकांकडे अधिक लक्ष देण्यासाठी योजना आखण्यात आलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आता विकसित भारताचे ध्येय आहे. ही चांगली गोष्ट होय.- हरिभाऊ बागडे, माजी सभापती, विधानसभा, महाराष्ट्र राज्य.

ज्वलंत प्रश्न बाजूला टाकले....पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक उत्तम नेते म्हणून लोकांवर छाप असली तरी भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात ज्वलंत प्रश्न बाजूला टाकले असल्याचे दिसून येत आहे. याउलट काँग्रेसच्या जाहीरनाम्यात महागाई कमी करू, बेरोजगारी कमी करू, आरक्षणाची मर्यादा हटवू, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देऊ, जातनिहाय जनगणना करू अशी आश्वासनं देण्यात आलेली आहेत. या मुद्यांवर भाजपच्या जाहीरनाम्यात कोणतेच भाष्य करण्यात आलेले नाही.- सुनीता गीते, काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या माजी सदस्या

‘अच्छे दिन’ आले का?...भाजपाचा जाहीरनामा म्हणजे भ्रामक व खोटी आश्वासने. केवळ जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न... आतापर्यंत भाजपानं कोणती आश्वासनं पाळली? ‘अच्छे दिन आयेंगे’ म्हणाले होते. आले का अच्छे दिन? जनतेची घोर निराशाच झाली ना? भाजपाचा जाहीरनामा म्हणजे मते मिळवण्याचा अजेंडा वाटतो.- सुधाकर सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

पुन्हा जुमलेबाजी....!भाजपचा जाहीरनामा म्हणजे पुन्हा जुमलेबाजी. मूळ प्रश्नांना यात बगल देण्याचा प्रयत्न झाला आहे. महागाई गगनाला भिडली असताना, पेट्रोल-डिझेलचे व गॅस सिलिंडरचे भाव वाढले असताना त्याबद्दल भाजप का बोलत नाही? नॉन इश्श्यूजवर चर्चा करून भाजप लोकांची दिशाभूल करीत आहे.- किशनचंद तनवाणी, जिल्हाप्रमुख, उद्धवसेना

संविधानाच्या सुरक्षिततेबद्दल स्पष्ट बोललं पाहिजे...ज्वलंत प्रश्नांबद्दल भाजपच्या जाहीरनाम्यात स्पष्टता नाही. संविधानाच्या सुरक्षिततेबद्दल भाजपने स्पष्ट ग्वाही दिली पाहिजे. चारशे पारचा नारा कशासाठी? एवढं बहुमत मिळवून करायचं काय? लोकांच्या मनात शंका आहे की, संविधानच बदलले जाईल. आरक्षण व जातनिहाय जनगणनेबद्दल जाहीरनाम्यात काहीच नाही.- रमेश गायकवाड, माजी सदस्य, जि. प., छत्रपती संभाजीनगर

सर्वसामान्यांना न्याय देणारा जाहीरनामा....भाजपचा जाहीरनामा एकंदरीतच चांगला असून, तो सर्वसामान्यांना न्याय देणारा आहे. वीज आणि शुद्ध पाणी पुरवण्याचे आश्वासन सामान्यांना दिलासा देणारे आहे.- अभिजित देशमुख, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट

अल्पसंख्यकांच्या विरोधातला जाहीरनामासीएए व एनआरसीचा पुरस्कार करणारा भाजपचा जाहीरनामा या देशातील अल्पसंख्यकांच्या विरोधी जाहीरनामा होय. सीएए व एनआरसीचा पुरस्कार म्हणजे संविधानविरोधी कृत्य होय. एमआयएम याचा नेहमीच विरोध करीत आलेली आहे व पुढेही करेल.- शारेक नक्षबंदी, शहराध्यक्ष, एमआयएम

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४