शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata Death: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

तहानलेल्या विद्यापीठाला मिळणार बंधाऱ्यांचा दिलासा; तीन कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी मिळाला निधी

By विजय सरवदे | Published: January 03, 2024 8:16 PM

नवीन तीन कोल्हापुरी बंधारे उभारणे आणि काही बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीने ५० लाखांचा निधी दिला

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा परिसर डोंगराने वेढलेला आहे. डोंगरावर कोसळणारे पावसाचे पाणी वाहून जाऊ नये, यासाठी ते अडवून जिरविण्यासाठी नवीन तीन कोल्हापुरी बंधारे उभारणे आणि काही बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीने ५० लाखांचा निधी दिला आहे. यामुळे परिसरातील वनराईबरोबरच विहिरींनाही आता बऱ्यापैकी जीवदान मिळणार आहे. विशेष म्हणजे, परिसरातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचे प्रयत्न वाखाणण्यासारखेच राहिले, अशा प्रतिक्रिया विद्यापीठ वर्तुळात उमटल्या.

७२४ एकरमध्ये पसरलेल्या विद्यापीठ परिसरात अनेक नाले आहेत. परिसरात अनेक विभाग, प्रशासकीय कार्यालये, विविध लॅब, विद्यार्थी वसतिगृहे आणि प्राध्यापक- कर्मचारी निवासस्थाने आहेत. जवळपास १२५ एकर परिसरात आंबा, चिंच, आवळा, चिकू आदींच्या फळबागा विस्तारलेल्या आहेत. वनस्पतिशास्त्र अभ्यासक्रमांशी संबंधित विविध प्रकारच्या दुर्मीळ वनस्पतींनी नटलेली उद्याने आहेत. यासाठी मात्र, दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सध्या अस्तित्वात असलेले उपलब्ध १७ बंधारे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्यासाठी अपुरे पडत आहेत. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने आमदार प्रदीप जैस्वाल यांच्याकडे नवीन बंधारे उभारणे, तसेच जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती व खोलीकरणासाठी एक कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव सादर केला होता. आ. जैस्वाल यांनी यासाठी पुढाकार घेऊन जिल्हा नियोजन समितीमार्फत ५० लाखांचा निधी नुकताच विद्यापीठासाठी मंजूर केला आहे.

सन २०१६-१७ मध्ये तत्कालीन कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या कार्यकाळात तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी विद्यापीठातील सिंचनासाठी २५ लाखांचा निधी दिला होता. त्यातून विद्यापीठ परिसरातील जुन्या बंधाऱ्यांची साठवण क्षमता वाढविण्यात आली. याशिवाय ठिकठिकाणी चर खोदून पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविण्यात आले.

१५ कोटी लिटरपर्यंत साठवण क्षमता वाढणारविद्यापीठ परिसरात सध्या सहा मोठे सिमेंट बंधारे आणि ११ नाला बंधारे आहेत. या बंधाऱ्यांची पाणी साठवण क्षमता १०.५० कोटी लिटर एवढी आहे. आता प्राप्त झालेल्या ५० कोटी रुपयांतून प्रत्येकी दीड कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेचे तीन कोल्हापुरी बंधारे उभारले जाणार आहेत. यामुळे विद्यापीठ परिसरात १५ कोटी लिटर एवढी साठवण क्षमता वाढेल, यास विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता रवींद्र काळे यांनी दुजोरा दिला आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादRainपाऊस