शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
3
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
6
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
7
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
8
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
9
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
10
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
11
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
12
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
13
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
14
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
15
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
16
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
17
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
18
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
19
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
20
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात

दुष्काळात तेरावा महिना!

By admin | Published: April 23, 2016 11:34 PM

जालना : जायकवाडी ते जालना जलवाहिनी इंदेवाडीजवळ शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.

जालना : जायकवाडी ते जालना जलवाहिनी इंदेवाडीजवळ शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. ऐन दुष्काळात जलवाहिनी फुटल्याने जालनेकरांना दुष्काळात तेरावा महिना सहन करावा लागणार आहे. जलवाहिनी फुटल्याने चार दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने कळविले आहे. घाणेवाडी जलाशय आटल्याने शहरातील नवीन जालना भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जायकवाडी जलवाहिनीचा दुरूस्तीचा प्रश्नही गाजत आहे. अशा परिस्थतीत एका दूरध्वनी सेवा देणाऱ्या कंपनीचे केबल अंथरण्याचे काम सुरू असताना पोकलॅनचा धक्का लागून जलवाहिनीचा पाईप निखळून गळती सुरू झाली. काही वेळातच परिसर जलमय झाला. दूरपर्यंत पाणी वाहून गेले. काही महिलांनी पाणी भरून घेतले. व्हॉल्व्ह बंद करेपर्यंत लाखो लिटर पाणी वाहून गेले. या पाण्यामुळे परिसरातील दोन विहिरीही तुडुंब भरल्या होत्या. जायकवाडी ते जालना जलवाहिनी दुरूस्तीच्या मुद्यावरून पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. संबंधित एजन्सी दुरूस्ती करण्यासाठी किती दिवस लावणार, पाणीपुरवठा कधी सुरळीत होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासोबतच या जलवाहिनीस इतर ठिकाणीही गळती लागली आहे. व्हॉल्व्हमधूनही मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. पालिका प्रत्येक व्हॉल्व्हर लोखंडी जाळ्या बसविणार होती. चार महिने उलटल्यानंतरही पालिकेने या जाळ्या बसविलेल्या नाहीत. परिणामी व्हॉल्व्हमधून गळतीसोबतच चोरीही वाढली आहे. मुख्याधिकादी दीपक पुजारी हे वैद्यकीय रजेवर आहेत. कर्मचारी संपामुळे सर्व विभाग बंद आहेत. त्यामुळे पालिकेत अधिकारी व कर्मचारी नसल्याने पालिका वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. त्यातच जलवाहिनी फुटल्याने शहरवासियांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. घाणेवाडी जलाशय कोरडा पडल्याने नवीन जालना भागातील बहुतांश नागरिकांना जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. त्यातच आता जलवाहिनी फुटल्याने समस्या गंभीर बनत आहे. शहरात ठिकठिकाणी अंतर्गत जलवाहिनीला गळती लागली असली तरी पालिकेकडून कानाडोळा होत आहे. दुरूस्तीच्या नावाखाली थातूरमातूर डागडुजी करून बिल उचलण्याचा सर्रास प्रकार पालिकेत सुरू असल्याचे चित्र आहे. इंदेवाडीसोबतच गोलापांगरी, शेवगा, हारतखेडा, मठपिंपळगाव पाटी, जामखेड पाटी, पाचोड रस्त्या, अंबड रस्ता आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलवाहिनीला गळती लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागत आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. नगर पालिकेने जलवाहिनी दुरूस्तीसाठी स्वतंत्र यंत्रणा तयार ठेवावी, अशी मागणीही नागरिकांतून जोर धरत आहे. पालिकेचा पाणीपुरवठा विभाग असून अडचण नसून खोळंबा असा बनला आहे. (प्रतिनिधी)जायकवाडी ते जालना जलवाहिनी फुटल्याने शहरवासियांना चार दिवस निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. जलवाहिनी दुरूस्ती मंगळवारपर्यंत पूर्ण होईल, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले. कडक उन्हामुळे कूपनलिका आटल्या आहेत. त्यातच चार दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. जलवाहिनी दुरूस्तीचे काम तात्काळ हाती घेतले आहे. तरीही तीन ते चार दिवस पाणीपुरवठा बंद राहील, असे पाणीपुरवठा सभापती राहुल हिवराळे यांनी सांगितले.