शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

दीड तासाच्या विमान प्रवासासाठी तीन तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 11:48 PM

मुसळधार पावसामुळे मंगळवारी मुंबईत हवाई वाहतूक विस्कळीत झाली. त्यात स्पाईस जेटचे विमान घसरल्याने मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद करण्यात आली. त्यामुळे विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. बुधवारीदेखील दीड तासाच्या प्रवासासाठी एअर इंडियाच्या मुंबई-औरंगाबाद विमानाच्या प्रवाशांना जवळपास तीन तास वाट पाहावी लागली.

ठळक मुद्देमुंबई-औरंगाबाद विमान : दुसऱ्या दिवशीही विलंब, मुंबईतील पावसाचा परिणाम

औरंगाबाद : मुसळधार पावसामुळे मंगळवारी मुंबईत हवाई वाहतूक विस्कळीत झाली. त्यात स्पाईस जेटचे विमान घसरल्याने मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद करण्यात आली. त्यामुळे विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. बुधवारीदेखील दीड तासाच्या प्रवासासाठी एअर इंडियाच्या मुंबई-औरंगाबाद विमानाच्या प्रवाशांना जवळपास तीन तास वाट पाहावी लागली.एअर इंडियाचे मुंबई-औरंगाबाद विमान दुपारी ३.२५ वा. उड्डाण करते. हे विमान औरंगाबादला सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास येते. या ठिकाणाहून हे विमान सायंकाळी ५.२० वाजेच्या सुमारास दिल्लीसाठी उड्डाण घेते. सायंकाळी ७.१० वाजता हे विमान दिल्लीत पोहोचत असते.मुंबईत स्पाईस जेटचे विमान घसरल्याच्या घटनेनंतर मुख्य धावपट्टी बंद करण्यात आली. पर्यायी धावपट्टीवर विमाने उतरविण्यात आली. काही आंतरराष्ट्रीय विमानांचा मार्ग बदलण्यात आला. या विमानांना बंगळुरू, अहमदाबादसह अन्य विमानतळांवर उतरविण्यात आले. हवाई वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईहून औरंगाबादला येणाºया विमानाला सलग दुसºया दिवशीही विलंब झाला.विमान प्रवासासाठी प्रवाशांना उड्डाणाच्या एक तास आधी येऊन आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी लागते. दुपारी ३.२५ ऐवजी सायंकाळी ६ वाजता मुंबई-औरंगाबाद-दिल्ली विमान उड्डाण करणार असल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली होती. मुंबईतील पावसाच्या परिणामामुळे विमानाला विलंब झाल्याची माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली.दोन रेल्वे रद्दमुंबईतील पावसामुळे बुधवारी मुंबईला जाणारी नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस आणि सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईला जाण्याचे नियोजन केलेल्या प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळRainपाऊस